शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

विद्यार्थिनींना जागा मिळेना

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

शंकरनगर : अहिल्याबाई होळकर पासधारक शालेय मुलींसाठी मोफत प्रवासासाठी मानव विकास अभियानांतर्गत सुरू केलेल्या निळ्या गाड्यांचा वापर सामान्य प्रवाशांसाठी करण्यात येत

शंकरनगर : अहिल्याबाई होळकर पासधारक शालेय मुलींसाठी मोफत प्रवासासाठी मानव विकास अभियानांतर्गत सुरू केलेल्या निळ्या गाड्यांचा वापर सामान्य प्रवाशांसाठी करण्यात येत असून खरे लाभधारक विद्यार्थी-विद्यार्थिनी मात्र उभ्यानेस प्रवास करीत आहेत़सब पढे, सब आगे बढे़़़ या विचारानुसार राज्य शासनाने मुलींना शिक्षण घेण्यास अधिक प्रवृत्त करण्यासाठी सप्टेंबर २०१२ पासून मानव विकास अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांचे राहण्याचे गाव ते शाळेचे ठिकाण असलेले गाव या दरम्यान विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या़ निळ्या रंगाच्या मानव विकास अभियानाची जाहिरात लिहिलेल्या या बसेस सर्व आगारांना पाठवून त्या बसेस केवळ शाळेच्या वेळातच चालविण्याच्या व अन्य वेळी थांबवून ठेवण्याच्या सूचना दिल्या़नवीन गाड्या आल्यापासून आगार प्रमुखांनी केवळ नावापुरत्या शाळेच्या वेळी गाड्या सोडल्या़ त्यानंतर या गाड्यांमधून सामान्य प्रवाशांची ने-आण सुरू केली़देगलूर आगाराला मानव विकास अभियानांतर्गत एम़एच़२०-८५८७, ८५८८, ८५९३, ८५९५, ८५९७ या पाच गाड्या आल्या़ या गाड्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची ने आण करण्यासाठी विशिष्ट वेळी न लावता देगलूर आगाराने एक गाडी सकाळी- शेवाळा- औराद, दुसरी - देगलूर-भोकसखेडा-नांदेड, तिसरी- देगलूर-येरगी-हणेगाव-औराद, चौथी-सकाळी सात वाजता- देगलूर-सांगवी-देगलूर-नांदेड, पाचवी- देगलूर- अंबुलगा- हणेगाव- वझर (मुक्काम)़ अशा मार्गावर मानव विकासच्या गाड्या लावल्या आहेत़ या गाड्या चालवून देगलूर बस आगार आपले उत्पन्न वाढवून घेत आहे़ तर याउलट शासनाने विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर पासेस दिल्या आहेत़ अशा पासधारक सर्व विद्यार्थिनींना या बसमधून प्रवास मोफत आहे़ तर विद्यार्थ्यांना प्रवासी पास सवलतीप्रमाणे बसभाडे आहे़देगलूरसह जिल्ह्याच्या सर्व आगार प्रमुखांनी शालेय मुला-मुलींसाठी आलेल्या मानव विकास अभियानातील, बसेस शाळेच्या वेळेवर आणि विद्यार्थ्यांसाठीच सोडाव्यात, अशी शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्गातून मागणी होत आहे़ (वार्ताहर)बसगाड्या वेळेवर सुटेनातगावातून शाळेच्या गावी जाण्यासाठी सामान्यपणे ८़४५ ते ९ वाजेच्या सुमारास बसगाडी असावी लागते़ परंतु प्रवाशांच्या लोभापायी देगलूर आगार वेळेवर या गाड्या सोडत नाही़ कधी सुटलीच तर गाडीतील सर्व सीटवर सामान्य प्रवासी बसलेले असतात़ आणि खऱ्या लाभधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मात्र गाव ते शाळा आणि शाळा ते गाव या अंतराचा प्रवास उभे राहूनच करावा लागतो़