शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाऊणतास रास्ता रोको

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

जालना : केंद्र व राज्य सरकारने अनेक जनहित विरोधी निर्णय घेतल्याचा निषेध करून सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी येथील अंबड

जालना : केंद्र व राज्य सरकारने अनेक जनहित विरोधी निर्णय घेतल्याचा निषेध करून सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी येथील अंबड चौफुली भागात पाऊणतास रास्ता रोको करण्यात आला.दुपारी १२ वाजेपासूनच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते अंबड चौफुली परिसरात एकत्र येऊ लागले होते. कार्यकर्त्यांची गर्दी आणि तेथे बंदोबस्तासाठी आलेले पोलिस यामुळे वाहतूक संथ झाली होती. १ वाजेच्या सुमारास आंदोलनास प्रारंभ झाल्याने ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, महिला जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, विष्णूपंत कंटूले, बद्रीनारायण ढवळे, संदीप कड, संदीप गोरे, सुरेश तळेकर, एकबाल कुरैशी, अंकुश राऊत, राम सावंत, मोहन इंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक संकटांनी शेतकरी उद्ध्वस्थ झालेला असतानाही केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली नाही.हेक्टरी ४५०० रुपये जाहीर करतानाही २ हेक्टरपर्यंत मर्यादा घालून व त्यापेक्षा नाममात्र अधिक शेती असणाऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो त्वरीत रद्द करून शेतकऱ्यांच्या एकूण शेतजमिनीचा विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. भाजपा-सेनेने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या वीज बिलात काँग्रेस सरकारने २० टक्के सवलत दिली होती. यासाठी काँगे्रस सरकारने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र भाजपा-सेना युती सरकारने वीज बिलाचा भूर्दंड देऊन कामगारांवर आर्थिक बोजा लादला असाही आरोप करण्यात आला. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याबाबत आंदोलकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून जनहित विरोधी निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)