शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

रोपे करपण्यास सुरूवात

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

हिंगोली : दीड महिन्याच्या उशिरानंतर कशीबशी झालेल्या पेरणीवर वरूणराजाची वक्रदृष्टी कायम राहिली. कशीतरी अग्नीवर निघालेली कोवळी रोपे पाण्याअभावी करपण्यास सुरूवात झाली.

हिंगोली : दीड महिन्याच्या उशिरानंतर कशीबशी झालेल्या पेरणीवर वरूणराजाची वक्रदृष्टी कायम राहिली. कशीतरी अग्नीवर निघालेली कोवळी रोपे पाण्याअभावी करपण्यास सुरूवात झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचा जीव घायकुतीला आला. सुरूवातीला पावसासाठी धावा तर आता प्रत्येकाने पेरणीसाठी लाख-लाख रूपये घालून बसलेल्या उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले. मृगानंतर आर्द्राही कोरड्या गेल्याने पुनर्वसूने दिलासा दिला. तोपर्यंत पेरणीला महिन्याचा उशिर झाल्याने मूग, उडदाच्या पेरणीचा कालावधी निघून गेला. दरम्यान कशीबशी उत्पादकांनी धूळपेरणी केली. काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट ओढवले. पेरणीसाठी लाख-लाख रूपयांची खत, बियाणे टाकले. सरसकट पेरणी आटोपताच थोड्याच ओलीवर बियाणे उगवले. जमिनीबाहेर कोंब येताच पावसाने पावसाने डोळे वटारले. मागील सहा दिवसांपासून दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. दरम्यान २७ आणि २८ जुलै रोजी अनुक्रमे ६ मिमी पाऊस झाल्याने ११६ मिमीवर सरासरी गेली. नंतर जोराचा वारा आणि कडक उन्हाने जमिनी कोरड्या पडल्या. हळूहळू रोपे सुकण्यास सुरूवात झाली. मागील सहा दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. जमिनीतील थोडसे बाष्पही गेल्याने पिके करपू लागली. अधिच तपश्चर्या केल्याप्रमाणे धावा केल्यानंतर पाऊस आला आणि नवसासारखी पेरणी झाली. उत्पादनाची हमी नसताना एक-एक उत्पादक लाखो रूपये घालून बसला. कारण आजघडीला जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्राच्या पुढेच पेरणी झाली आहे. गतवर्षी यावेळी उत्पादक कोळपणी, फवारणी करीत होते. शिवाय जिल्ह्यात ८१० मिमी पाऊस झाला होता. यंदा सव्वासे मिमीची देखील सरासरी झालेली नाही. परिणामी बियाण्याच्या खरेदीतून हातचे निघून गेल्यानंतर पावसाअभावी पदराचे निघून जाण्याची शक्यता आहे. आणखीच पाऊस लांबला तर पिकांना पाळी घालावी लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)तालुके गतवर्षी २८ जुलै ३ आॅगस्टहिंगोली ८४६.८२ ८४.४४ ९०.४४कळमनुरी ७५६.३६ १०९.०२ ११०.०७सेनगाव ७७३.५६ ११६.८४ ११९.१७वसमत ७२६.५६ १०८.८४ ११०.५७औंढा ना. ९४७.६२ १६३.२५ १६८एकूण ८१०.०२ ११६.०६ ११९.८१शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीतभांडेगाव : शेतकऱ्यांनी यंदा पेरणी केली; परंतु पावसाअभावी पिके डोलण्या ऐवजी सुकू लागली. सकाळी टवटवीत दिसणारे पिके दुपारी माना टाकू लागली. त्यामुळे ही दुर्दशा डोळ्याने पाहू वाटत नसल्याने उत्पादक शेताकडे जात नाहीत.हिंगोली तालुक्यातील जामठी, साटंबा, भांडेगाव, परिसरात हलक्या पावसावर पेरण्या आटोपल्या. त्यानंतर मोठा पाऊस झालाच नसल्याने पिके वाळू लागली. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी पाणी देत आहेत; परंतु विहिरी आणि बोअर आटल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. खरीप हंगामास दोन महिने पूर्ण झाले असल्याने गतवर्षी मूग, उडदाच्या तोडणीचे दिवस होते. यंदा शेतकरी पेरणीमध्येच परेशान आहेत. पेरलेले महागामोलाचे बियाणे आता वाळत असल्याने हे पाहणे कठीण झाल्याने शेतकरी रानाकडेही जात नसल्याचे चित्र आहे.