शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मार्चएन्डची लगबग सुरू

By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST

जालना : मार्चएन्डला दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी आतपासूनच जिल्ह्यात सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये मार्चएन्डची लगबग सुरू झाली आहे.

जालना : मार्चएन्डला दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी आतपासूनच जिल्ह्यात सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये मार्चएन्डची लगबग सुरू झाली आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीचा २०१४-१५ चा ४० टक्के निधी अद्याप बीडीएसवर उपलब्ध झालाच नाही. तर काही कामांच्या निविदा प्रक्रियाही अद्याप शिल्लक असल्याने कोट्यवधींचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन मंडळाला शासनाने १५० कोटींचा निधी मंजुर केला होता. मात्र सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे प्रत्येक जिल्ह्यांतील नियोजन समितीच्या निधीला कात्री लावल्याने जिल्ह्याला १३५ कोटींचाच निधी मिळणार आहे. त्यापैकी ९१ कोटींचा निधी बीडीएसवर उपलब्ध करून देण्यात आला असून प्रत्यक्षात खर्च ४६ कोटींचा झालेला आहे. उर्वरित निधी बीडीएसवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेला ४६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र त्यापैकी केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. सिंचन विभागाला ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, परंतु निविदा प्रक्रियाच नसल्याने कामे सुरू झालेली नाहीत. महिला बालकल्याण व आरोग्य विभागाचा निधीही अद्याप खर्च नाही.याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सतीश टोपे म्हणाले, शासनाने उर्वरीत ४० टक्के निधी तातडीने बीडीएसवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्हापरिषदेला निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही काही विभागांची कामे का सुरू झाली नाहीत, हा संशोधनाचा भाग असल्याचे ते म्हणाले. ४सदस्या संध्या देठे म्हणाल्या, नियोजन समितीने उपलब्ध केलेला निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. मात्र असे असताना विविध विभागांचा निधी का अखर्चित राहिला, याची तपासणी अधिकाऱ्यांनी करावी, असे त्यांनी सांगितले. ४सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामे पूर्ण होऊनही या विभागाचा पूर्ण निधी बीडीएसवर उपलब्ध न झाल्याने या कामांची देयके थांबविण्यात आली आहेत.