शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दीड कोटीची फवारणी

By admin | Updated: September 16, 2014 01:32 IST

औसा : तालुक्यात यंदा खरीपाच्या उशिरा पेरण्या झाल्या़ त्यानंतर पावसाने उघाड देत पुन्हा रिमझिम हजेरी लावली़ ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला़

औसा : तालुक्यात यंदा खरीपाच्या उशिरा पेरण्या झाल्या़ त्यानंतर पावसाने उघाड देत पुन्हा रिमझिम हजेरी लावली़ ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला़ या किडीपासून बचावासाठी शेतकरी गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर फवारणी करीत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दीड कोटी रुपये फवारणीवर खर्च केला आहे़ तालुक्यात ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे़ यामधील ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली़ जवळपास महिना- सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, उगवलेली पिके वाळू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी विहीर, कुपनलिकातील पाणी देऊन ती जगविली़ रिमझिम पावसाचा फायदा पिकांना झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला़ त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शेतकरी सोयाबीनवर अळीनाशक औषधांची फवारणी करीत आहेत़ एक एकर सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी सरासरी १ हजार रुपये खर्च आहे़ या हिशोबाने तालुक्यात दीड कोटी रुपयांची शेतकऱ्यांनी फवारणी केली असल्याचे पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)