शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

सोयाबीनवरच भिस्त !

By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST

रमेश शिंदे, औसा तब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने खरीप पेरण्यांना उशीर झाला आहे़ उडीद आणि मूग पेरणीचा कालावधी संपला असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता सोयाबीनवरच अवलंबून आहे़

रमेश शिंदे, औसातब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने खरीप पेरण्यांना उशीर झाला आहे़ उडीद आणि मूग पेरणीचा कालावधी संपला असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता सोयाबीनवरच अवलंबून आहे़ त्यामुळे तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एक लाख खरिपाचे क्षेत्र असलेल्या या तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. घरगुती बियाण्यांच्या उपलब्धतेमुळे आणि कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका. पण रोहिण्या, मृग आणि आर्र्द्रा ही पावसाळ्याची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेली. पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसू नक्षत्राने हात दिला. तालुक्याच्या काही भागात दमदार तर काही भागात साधारण पण पेरण्यायोग्य पाऊस झाला. आता शेतकरी पेरण्यांच्या लगबगीत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी यावर्षी तरी किमान वेळेवर पाऊस होईल, ही अपेक्षा ठेवून होता. पण पावसाळाच तब्बल महिनाभर लांबला. उडीद-मुगासारख्या पिकांची मृग-आर्द्रात पेरणी करणे अपेक्षित आहे. पण त्या पेरण्याच न झाल्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे.२०१२-१३ च्या खरीप हंगामामध्ये औसा तालुक्यात १ लाख ८९ हजार क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ४६ हजार ४६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन, ५ हजार ३७ हेक्टर्स क्षेत्रावर उडीद तर २ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती. तर २०१३-१४ च्या खरीप हंगामात ८३ हजार ६९९ हेक्टर्स क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ३६ हजार २०० हेक्टर्सवर सोयाबीन, ८ हजार ३०० हेक्टर्सवर उडीद तर ३ हजार ९०० हेक्टर्सवर मूग या पिकांची पेरणी झाली होती. २०१२-१३ पेक्षा २०१३-१४ मध्ये उडीद-मुगाचे क्षेत्र वाढले होते. पण यावर्षी थोड्याफार प्रमाणात मुगाची पेरणी होताना दिसतेय. पण उडीद मात्र शून्यावर राहण्याची स्थिती आहे. उडीद-मूग या पिकाखालील क्षेत्र आणि पेरण्यांना उशीर झाल्यामुळे अन्य काही क्षेत्रही सोयाबीनखाली येण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या बियाण्याचे भाव यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढले. पण त्यापूर्वीच कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे पेरावे म्हणून जनजागृती केली. तसेच बीज प्रक्रियेसंदर्भातही शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी बियाणे विकत घेण्याऐवजी घरगुती वापरत आहेत. तर कृषी सेवा केंद्रांवर अजूनही मोठ्या प्रमाणात बियाणे शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे. उशिरा झालेला पाऊस आणि विलंबाने होणाऱ्या पेरण्या यामुळे तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र हे सोयाबीनने व्यापणार आहे़शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी़़़ सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगून पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश शिंदे म्हणाले की, पण घरगुती बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे पेरणी करताना जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करताना बियाणाचे टरफल निघणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन सतीश शिंदे यांनी केले आहे.