शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन एकरी दोन क्विंटलवर

By admin | Updated: October 22, 2014 13:17 IST

जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा फटका खरीपाच्या पिकांना बसल्यामुळे सोयाबीनच्या उतार्‍यात मोठीघट झाली असून एकरी दीड ते दोन क्विंटल सोयाबीन होत आहे.

रामेश्‍वर काकडे, नांदेड
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा फटका खरीपाच्या पिकांना बसल्यामुळे सोयाबीनच्या उतार्‍यात मोठीघट झाली असून एकरी दीड ते दोन क्विंटल सोयाबीन होत आहे. यामुळे शेतकर्‍यांवर ऐन दिवाळीत दुष्काळाचे सावट ओढावले आहे. 
पेरण्या करण्यासाठी मृग नक्षत्राला पाऊसच झाला नसल्याने पेरण्याही वेळेवर होऊ शकल्या नाहीत, यानंतरही अधून-मधून बरसलेल्या पावसाने कसे-बसे पीकांना जीवदान मिळाले, मात्र त्यानंतर पावसाने उघडीपच दिल्याने सोयाबीनची वाढ खूंटून पिके वाळली आहेत. सध्या काढणीचा हंगाम जिल्हभरात जोरात सुरु असला तरी उत्पादकाच्या पदरात किती पडेल, याचा विचार करणे मात्र अवघड झाले आहे. एक एकर सोयाबीनची पेरणी करण्यासाठी शेतीची मशागात, बियाणे-खत, निंदणी-खूरपणी, कोळपणी आणि यानंतर काढणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च आला. एकरी पेरणीसाठी किमान बियाणे-खतासाठी ५ हजार, निंदणी-खूरपणी किमान २ हजार, फवारणी किमान एक ते दीड हजार व यानंतर काढणीसाठी एकरी एक ते दीड हजार तसेच काढणी केल्यानंतर मळणीयंत्राचे जवळपास ३00 ते ५00 रुपये असा एकूण एक एकरासाठी १0 हजार रुपयाचा खर्च येत आहे. आजघडीला बाजारात सोयाबीनला ३ हजार ते साडेतीन हजार रुपयार्पंत भाव मिळत असल्याने एका एकरात सहा ते साडेसहा हजार रुपयाचे उत्पन्न मिळत असून शेतकर्‍यांना एकरी कमीतकमी ३५00 ते ४ हजार रुपयांचे नुकसान होत आहे. 
सोयाबीनचा एकरी दीड ते दोन क्विंटलचाच उतारा येत असल्याने शेतकर्‍यांनी खत-बियाणासाठी टाकलेला खर्चही पदरातूनच लागत आहे. जिल्ह्यातील काही भागात असलेल्या सिंचनक्षेत्राखालील तालुक्यात विहिरी-बोअरचे पाणी दिल्याने उतारा काही प्रमाणात वाढेल. परंतु कोरडवाहू भागात उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी मात्र पूरता हवालदिल झाला आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पादन अल्प होत असल्याने शेतकरी पूरता कंगाल झाला आहे. यासाठी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. उत्पादनात घट झाल्याने ऐन दिवाळीत सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचेच दिवाळे निघाले आहे.
■ दिवाळी सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील विविध भागातील बाजारपेठेत नागरीकांची गर्दी दिसत आहे. मात्र दुसरीकडे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने ऐन दिवाळीतच शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले आहे. यामुळे ग्रामीण भागात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दिवाळी फीकी पडली आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करुन पीकविमा काढलेल्या शेतकर्‍यांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.