शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांची घट !

By admin | Updated: October 25, 2014 23:48 IST

लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे

लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे त्या पिकालाही पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्हाभरातील ३ लाख ५ हजार हेक्टर्सवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात उशिरा पाऊस झाला. झालेल्या अल्पश: पावसावर हायब्रीड ज्वारी, तूर, साळ, हरभरा आदी पिकांची पेरणी झाली़ परंत,ु उशिरा झालेल्या पावसामुळे इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली़ त्यातच लातूर जिल्ह्यातील अनेक गावात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही़ तर काही ठिकाणी आहे त्या सोयाबीनच्या पिकाला पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ३ लाख ५ हजार हेक्टरवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दुसऱ्या टप्प्यात पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले आहे़ तर काही हलक्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघालेला नाही़ गतवर्षी सोयाबीनच्या एका बॅगला बारा पोते उतार होता. परंतु, यावर्षी मात्र प्रती बॅगला सहा पोते उतार येत असल्याने शेतकऱ्याला अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ शेती निसर्गावर अवलंबून आहे़ निसर्गाने साथ दिली तर शेतकरी सुखी व निसर्गाने साथ नाही दिल्यास शेतकऱ्यासह सर्वच दुखी अशी परिस्थिती निर्माण होते़ परंतु, यावर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे़ सोयाबीन हे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेऱ्यात इतर पिकाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ परंतु, उशिरा झालेला पाऊस व कमी पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही़ लातूरच्या बाजापेठेत आहे त्या सोयाबीनलाही ३ हजार ५० रूपये क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे़ (प्रतिनिधी)४शेतकऱ्याने इतर पिकापेक्षा नगदी पीक म्हणून इतर पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे काही ठिकाणी सोयाबीन उगवले नाही तर काही ठिकाणी आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातून उत्पादनखर्चही निघत नसल्याने अनंत अडचणीला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भरत जाधव या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे़४जिल्ह्यात ३ लाख ५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे पावसाअभावी उत्पादन निम्म्यावर आलेले आहे़ ज्या शेतकऱ्याला गतवर्षी एका बॅगला बारा पोते होत होते, त्या शेतकऱ्याला सहा पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे़ परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक टी़एस़ मोटे यांनी सांगितले़