शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तपासणीत अडकले सोयाबीन अनुदान

By admin | Updated: April 9, 2017 23:25 IST

लातूरयंदा सोयाबीन उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी हमीभावापेक्षा कमी दर पडला़

हरी मोकाशे  लातूरयंदा सोयाबीन उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी हमीभावापेक्षा कमी दर पडला़ त्यामुळे शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल २०० रूपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले़ त्यानुसार प्रस्तावही मागविले़ मात्र सव्वादोन महिने उलटले तरी हे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीच्या तपासणीतच अडकले आहे़राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा असतो़ गत पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अति पाऊस झाला़ त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढण्याबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसानही झाले़ दरम्यान, बाजार समित्यांत विक्रीसाठी सोयाबीनची आवक वाढताच दरात मोठ्या प्रमाणात घट झाली़ शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली़ त्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाली़ या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने बाजार समितीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये असे अनुदान जाहीर केले़ या शेतकऱ्यांना २५ क्विंटलपर्यंतचे अनुदान दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले़ त्याचबरोबर १ आॅक्टोबर ३१ डिसेंबर या कालावधीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले़दरम्यान, सदरील प्रस्ताव बाजार समितीने एकत्र करून तालुकास्तरीय समितीकडे सादर करावेत, असे आदेश देण्यात आले होते़ या प्रस्तावांची तपासणी व छाननी तालुका सहायक निबंधक व अन्य दोघा सदस्यांच्या समितीने करून ते प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले़ जिल्हास्तरावरील जिल्हा उपनिबंधक व अन्य दोघा सदस्यांच्या समितीने त्याची पुन्हा छाननी करून अनुदानास पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी करून ती पुण्याच्या पणन संचालकांकडे तत्काळ सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले होते़शासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील ११ पैकी ९ बाजार समित्यांनी जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रस्ताव जमा करून ते तालुकास्तरीय समितीकडे सादर केले़ मात्र सव्वादोन महिने उलटले तरी अद्यापही या प्रस्तावांची छाननी पूर्ण झालेली दिसून येत नाही़ तालुकास्तरीय समितीकडेच हे प्रस्ताव अडकून राहिले आहेत़ त्यामुळे जिल्हास्तरीय समितीकडे हे प्रस्ताव कधी येणार आणि त्यांची तिथे छाननी कधी होणार व लाभार्थ्यांची यादी पणन संचालकांकडे कधी पाठविली जाणार, असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़