शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

तपासणीत अडकले सोयाबीन अनुदान

By admin | Updated: April 9, 2017 23:25 IST

लातूरयंदा सोयाबीन उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी हमीभावापेक्षा कमी दर पडला़

हरी मोकाशे  लातूरयंदा सोयाबीन उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली़ परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी हमीभावापेक्षा कमी दर पडला़ त्यामुळे शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल २०० रूपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले़ त्यानुसार प्रस्तावही मागविले़ मात्र सव्वादोन महिने उलटले तरी हे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीच्या तपासणीतच अडकले आहे़राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा असतो़ गत पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अति पाऊस झाला़ त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढण्याबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसानही झाले़ दरम्यान, बाजार समित्यांत विक्रीसाठी सोयाबीनची आवक वाढताच दरात मोठ्या प्रमाणात घट झाली़ शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली़ त्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाली़ या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने बाजार समितीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये असे अनुदान जाहीर केले़ या शेतकऱ्यांना २५ क्विंटलपर्यंतचे अनुदान दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले़ त्याचबरोबर १ आॅक्टोबर ३१ डिसेंबर या कालावधीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले़दरम्यान, सदरील प्रस्ताव बाजार समितीने एकत्र करून तालुकास्तरीय समितीकडे सादर करावेत, असे आदेश देण्यात आले होते़ या प्रस्तावांची तपासणी व छाननी तालुका सहायक निबंधक व अन्य दोघा सदस्यांच्या समितीने करून ते प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले़ जिल्हास्तरावरील जिल्हा उपनिबंधक व अन्य दोघा सदस्यांच्या समितीने त्याची पुन्हा छाननी करून अनुदानास पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी करून ती पुण्याच्या पणन संचालकांकडे तत्काळ सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले होते़शासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील ११ पैकी ९ बाजार समित्यांनी जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रस्ताव जमा करून ते तालुकास्तरीय समितीकडे सादर केले़ मात्र सव्वादोन महिने उलटले तरी अद्यापही या प्रस्तावांची छाननी पूर्ण झालेली दिसून येत नाही़ तालुकास्तरीय समितीकडेच हे प्रस्ताव अडकून राहिले आहेत़ त्यामुळे जिल्हास्तरीय समितीकडे हे प्रस्ताव कधी येणार आणि त्यांची तिथे छाननी कधी होणार व लाभार्थ्यांची यादी पणन संचालकांकडे कधी पाठविली जाणार, असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़