शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

By admin | Updated: July 17, 2014 00:27 IST

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली.

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली. सर्वांनीच पावसासाठी धावा सुरू केल्याने मृग नक्षत्राच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. सध्या हलका का होईना पाऊस मागील तीन दिवसांपासून हजेरी लावित असल्याने पेरते व्हा... पेरते व्हा... असा चातकाचा मधुर आवाज कानी पडू लागल्याने शेतकरी जोमाने पेरणीला लागला आहे; परंतु यंदा पेरणीला बराच उशिर झाल्याने पिके घेण्याच्या बाबतीत शेतकरी संभ्रमात आहेत. मागील वर्षी १२ जून रोजी आलेल्या मान्सून मध्ये सातत्य होते. पावसामुळे गतवर्षी अवघ्या १० दिवसांत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा उशिरा पाऊस दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शिवाय पुनर्वसू नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली होती. यंदा पेरणी होईल की नाही, या चिंतेत शेतकरी होता. पुढील आठवड्यात सुरूवात होणाऱ्या अश्लेषा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी वरूणराजाने उत्पादकांची हाक ऐकल्याने मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.प्रामुख्याने औंढा नागनाथ तालुक्यात ३० मिमी पाऊस सर्वाधिक होता. उर्वरित तालुक्यात सरासरी १० मिमीच्या खालीच पाऊस होता. १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिले. १५ जुलै रोजी देखील सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. १६ जुलै रोजी देखील समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पडती भावना निर्माण झाली आहे. आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा २ लाख ३५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याने एकूण पेरणीचा कालावधी वाढणार आहे. त्यापाठोपाठ ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाणार आहे. ,तद्नंतर तूर २७ आणि ज्वारी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु १५ जुलैैनंतर मूग आणि उडीद पिकाची पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दोन्ही पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात शेतकरी आहेत; परंतु अधिक रिस्क न घेता शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली असून घरचे बियाणे असलेले पीक पेरीत आहेत. आपत्कालीन पीक नियोजन असे १५ जुन ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येत होती; पण पावसाने ओढ दिल्याने उत्पादकांनी पिके घेण्याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ८ ते १५ जुलैैपर्यंत मुग आणि उडीदाची पेरणी होणे आवश्यक असते. आता या पिकाचा कालावधी निघून गेल्याने उत्पादक कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सुर्यफुल आदी पिके घेवू शकतात. यापुढे देखील पाऊस लांबल्यास पेरणी करताना आंतरपिके अधिक घ्यावीत. त्यात १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. सोयाबीनची पेरणी सर्वाधिक मागील वर्षी १२ जुन रोजी आलेल्या मान्सून पावसात पुढे सातत्य राहिल्यामुळे अवघ्या १० दिवसांत आटोपल्या होत्या खरीप हंगामाच्या पेरण्या. यंदा मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते आभाळाकडे. पुढील अश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी ऐकली वरूण राजाने हाक. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी झालेला होता सर्व तालुक्यांत पाऊस . १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिल्याने १५ जुलै रोजी पावसाची रिमझिम असताना झाला २.२ मिमी पाऊस.जिल्ह्यात अजून कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने आहे त्या ओलीवर शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरूवात.१५ जुलैैनंतर मूग व उडीद पिकाच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात आहेत शेतकरी. जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)तालुके गतवर्षी यंदा १३ जुलै १४ जुलैहिंगोली ४२७.८७ ५२.८७ ९.७१ ०.७१कळमनुरी ३४८.८८ ४०.४२ ६.१७ ४.०५सेनगाव ३६२.२६ ५८.८३ ८.५० ०.६७वसमत ३८१.७५ ५५.८६ ८.७१ ८.२९औंढा ना. ४६२.८७ ९३.२५ ३०.० ५.२५एकूण ३९७.१३ ६०.६१ १२.६२ ३.७९