शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

By admin | Updated: July 17, 2014 00:27 IST

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली.

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली. सर्वांनीच पावसासाठी धावा सुरू केल्याने मृग नक्षत्राच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. सध्या हलका का होईना पाऊस मागील तीन दिवसांपासून हजेरी लावित असल्याने पेरते व्हा... पेरते व्हा... असा चातकाचा मधुर आवाज कानी पडू लागल्याने शेतकरी जोमाने पेरणीला लागला आहे; परंतु यंदा पेरणीला बराच उशिर झाल्याने पिके घेण्याच्या बाबतीत शेतकरी संभ्रमात आहेत. मागील वर्षी १२ जून रोजी आलेल्या मान्सून मध्ये सातत्य होते. पावसामुळे गतवर्षी अवघ्या १० दिवसांत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा उशिरा पाऊस दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शिवाय पुनर्वसू नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली होती. यंदा पेरणी होईल की नाही, या चिंतेत शेतकरी होता. पुढील आठवड्यात सुरूवात होणाऱ्या अश्लेषा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी वरूणराजाने उत्पादकांची हाक ऐकल्याने मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.प्रामुख्याने औंढा नागनाथ तालुक्यात ३० मिमी पाऊस सर्वाधिक होता. उर्वरित तालुक्यात सरासरी १० मिमीच्या खालीच पाऊस होता. १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिले. १५ जुलै रोजी देखील सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. १६ जुलै रोजी देखील समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पडती भावना निर्माण झाली आहे. आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा २ लाख ३५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याने एकूण पेरणीचा कालावधी वाढणार आहे. त्यापाठोपाठ ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाणार आहे. ,तद्नंतर तूर २७ आणि ज्वारी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु १५ जुलैैनंतर मूग आणि उडीद पिकाची पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दोन्ही पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात शेतकरी आहेत; परंतु अधिक रिस्क न घेता शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली असून घरचे बियाणे असलेले पीक पेरीत आहेत. आपत्कालीन पीक नियोजन असे १५ जुन ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येत होती; पण पावसाने ओढ दिल्याने उत्पादकांनी पिके घेण्याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ८ ते १५ जुलैैपर्यंत मुग आणि उडीदाची पेरणी होणे आवश्यक असते. आता या पिकाचा कालावधी निघून गेल्याने उत्पादक कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सुर्यफुल आदी पिके घेवू शकतात. यापुढे देखील पाऊस लांबल्यास पेरणी करताना आंतरपिके अधिक घ्यावीत. त्यात १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. सोयाबीनची पेरणी सर्वाधिक मागील वर्षी १२ जुन रोजी आलेल्या मान्सून पावसात पुढे सातत्य राहिल्यामुळे अवघ्या १० दिवसांत आटोपल्या होत्या खरीप हंगामाच्या पेरण्या. यंदा मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते आभाळाकडे. पुढील अश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी ऐकली वरूण राजाने हाक. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी झालेला होता सर्व तालुक्यांत पाऊस . १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिल्याने १५ जुलै रोजी पावसाची रिमझिम असताना झाला २.२ मिमी पाऊस.जिल्ह्यात अजून कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने आहे त्या ओलीवर शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरूवात.१५ जुलैैनंतर मूग व उडीद पिकाच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात आहेत शेतकरी. जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)तालुके गतवर्षी यंदा १३ जुलै १४ जुलैहिंगोली ४२७.८७ ५२.८७ ९.७१ ०.७१कळमनुरी ३४८.८८ ४०.४२ ६.१७ ४.०५सेनगाव ३६२.२६ ५८.८३ ८.५० ०.६७वसमत ३८१.७५ ५५.८६ ८.७१ ८.२९औंढा ना. ४६२.८७ ९३.२५ ३०.० ५.२५एकूण ३९७.१३ ६०.६१ १२.६२ ३.७९