शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

By admin | Updated: June 8, 2014 00:53 IST

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे.

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यात यंदाची खरीप पेरणी साडेसतराशे हेक्टरवर होणार असून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेअंतर्गत बी- बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे प्रभारी कृषी अधिकारी आर.एफ. शिदोरे यांनी सांगितले. पाटोदा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. यंदा तरी पाऊस काळ चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे पूर्ण केलेली आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. यंदा पाटोदा तालुक्यात साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते पुरविण्यात येणार आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी शासनाकडून मात्र बी- बियाणांच्या योजनांसंदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना कृषी कार्यालयाला प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले जाते. सध्या मान्सून केरळात दाखल झाला असून येत्या काही दिवसांतच मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल, असे संकेत हवामान खात्याने नुकतेच दिले. यामुळे शेतकरी मोठ्या लगबगीने शेतातील कामे उरकते घेत आहे.कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये चालू वर्षी तालुका कृषी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमामधून गतिमान वैरण विकासासाठी २०० हेक्टर, कापूस विकासासाठी ५० हेक्टर क्षेत्राला लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी २०० हेक्टर, कडधान्य १०० हेक्टर तर एन.एम.ओ.पी. अंतर्गत सोयाबीन १०० हेक्टरसाठी लाभ दिला जाणार आहे. कोरडवाहू अभियानात तळेपिंपळगाव या गावाची निवड केली असून या अंतर्गत कापूस, मूग पिकास पन्नास हेक्टर आणि कापूस, उडीद पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना लाभ दिल्या जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्र वगळता सर्वांसाठी बी- बियाणे आणि खते या योजनेअंतर्गत दिल्या जातात. कापूस बियाणे लाभार्थी शेतकऱ्यास स्वत: खरेदी करावे लागतात. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेमुळे थोडाबहुत धीर आला आहे. मात्र या योजनेसंदर्भात प्रभारी कृषी अधिकारी आर.एम. शिदोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना अद्यापपर्यंत कार्यालयास मिळालेल्या नाहीत. वरिष्ठांचे आदेश व सूचनांनुसार सदरील योजना राबविली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत प्रगतशील शेतकरी पी.एस. पवार म्हणाले की, शासन राबवित असलेल्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर बी- बियाणे दिले तरच या योजनेचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.