शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST

सोमनाथ लाहोरकर , हदगाव हदगाव तालुक्यातील ८० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळापैकी ९ जुलैपर्यंत ४ हजार ९६० हेक्टर क्षेत्रफळात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांनी दिली़

सोमनाथ लाहोरकर , हदगावहदगाव तालुक्यातील ८० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळापैकी ९ जुलैपर्यंत ४ हजार ९६० हेक्टर क्षेत्रफळात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांनी दिली़मागील ४५ दिवसांत २०़१७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली़ मागील वर्षी मात्र जून महिन्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या व ९ जुलैपर्यंत ३४० मि़ मी़ पावसाची नोंद झाली होती़ अद्याप पावसाळी वातावरण तयार झाले नसून पूर्ण शेतकरी वर्ग आकाशकडे डोळे लावून बसला आहे़ याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून ग्रामीण भाग यासह शहरी भागातील व्यवहार ठप्प झाला आहे़ जून महिन्यात कापसाचे अंदाजे पेरणीक्षेत्र २२ हजार ६०० हेक्टर असतेवेळी आजपर्यंत ४ हजार ५४६ हेक्टर पेरणी झाली आहे़ तर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र ३१ हजार १०० हेक्टरपैकी फक्त ४१४ हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ कापूस व सोयाबीनची ४ हजार ९६० हेक्टरवर पेरणी आटोपली असली तरी सोयाबीनचा सर्व केलेला पेरा हा पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेला आहे़ तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांचेच कापूस तग धरून आहे़ तर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट समोर आले आहे़तर मागील २०१३ या वर्षी आज तारखेपर्यंत ३४० मि़ मी़ पावसाची नोंद झाली होती़ तर यावर्षी २०़१७ मि़ मी़ पावसाची नोंद झाल्याने यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक नसून भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया हदगाव येथील प्रगतशील शेतकरी गणेश तोष्णीवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांना सध्याच्या परिस्थितीत कोणते पीक घ्यावे असे विचारले असता ते म्हणाले, येत्या १५ जुलैपर्यंत पाऊस झाला तर सर्वच पिके घेता येतील, पण मूग, उडीद हे पीक घेता येणार नाहीत़ जर २० जुलैच्या पुढे मात्र कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी झाली तर यात उत्पन्नात घट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यासाठी येरंडा, सूर्यफूल, मका अशी उशिरा येणारी पिके घेतली तर फायदा होवू शकतो, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी निवघा मंडळ कृषी अधिकारी वसंतराव देशमुख, हदगाव मंडळ कृषीअधिकारी मुंढे, तामसा मंडळ कृषीअधिकारी एम़ एऩ हुसेन हे उपस्थित होते़