शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

सिग्नल टायमर गायब

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्यांतून मनपा प्रशासन हात झटकत आहे. शहरातील अनेक चौकांमधील सिग्नलवर बसविण्यात आलेले टायमर घड्याळच गायब झाले आहेत. कोणत्या सिग्नलवर किती थांबावे लागेल, हे वाहनधारकांना कळायला मार्गच नाही.महापालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सव्वाकोटी रुपये खर्च करून २७ सिग्नल अत्याधुनिक केले होते. पूर्वी सिग्नल लांब अंतरावरून दिसत नव्हते. त्यासाठी मनपाने उंच पोल उभारून सिग्नल लावले. प्रत्येक चौकात टायमर घड्याळ बसविण्यात आले होते. ही चांगली सुविधा औरंगाबादकरांना काही वर्षेच अनुभवता आली. मागील काही वर्षांपासून अनेक सिग्नलवरील टायमर गायब झाले आहेत. अत्यंत मोजक्याच चौकात हे टायमर घड्याळ दिसतात; पण त्यात किती वेळ थांबायचे ते आकडेच दिसत नाहीत. ११ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून मनपाने शहरातील सर्व वाहतूक दिवे चांगले केले होते. पूर्वी शहरातील सिग्नलची जी अवस्था होती, तीच अवस्था सध्या होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी तर आता सिग्नलच दिसत नाहीत. रात्री ९ वाजेनंतर फक्त पिवळा दिवा सुरू असायला हवा, अनेक ठिकाणी लाल दिवा बंद-चालू असतो. त्यामुळे नवीन वाहनधारक बुचकळ्यात पडतात. अचानक ब्रेक मारल्याने जालना रोडवर रात्री अपघातही झाले आहेत. मोंढा नाका, आकाशवाणी आणि अमरप्रीत चौकात रात्री १० ते १२ वाजेपर्यंत अनेक वाहनधारक वेगात जाण्याच्या प्रयत्नात सिग्नलवरील विचित्र दिवा पाहून अचानक थांबतात. विशेष बाब म्हणजे रात्री ९ वाजेनंतर शहरात जड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.