शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

सिग्नलचा फ्लॉप शो

By admin | Updated: September 16, 2014 01:34 IST

मल्हारीकांत देशमुख , परभणी रहदारी सुरळीत करण्याच्या दृष्टीने ‘फिर पहिलेसे’ म्हणत सुरु करण्यात आलेले सिग्नल शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. बेफिकीर वाहनचालक आणि

मल्हारीकांत देशमुख , परभणीरहदारी सुरळीत करण्याच्या दृष्टीने ‘फिर पहिलेसे’ म्हणत सुरु करण्यात आलेले सिग्नल शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. बेफिकीर वाहनचालक आणि गोंधळलेले पोलिस कर्मचारी यांच्यातील सावळ्यागोंधळाचा रोड शो सकाळ-संध्याकाळ रंगत आहे. सुरळीत वाहतुकीसाठी शहरात सिग्नल आवश्यक असले तरी यासंदर्भात संबंधितांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. शिवाय जेथे गरज आहे, तेथेच सिग्नलची उभारणी करणे अगत्याचे आहे. यासाठी पोलिस यंत्रणेला बदल करावा लागणार आहे. सध्या सुरु असलेली पद्धत ही सदोष असल्याने त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे.गल्लीबोळांच्या परभणी शहरातून वसमतरस्ता हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. स्टेशनपासून निघणारे दोन आणि दर्गा ते कारेगाव रस्ता हे तीन रस्ते अस्तित्वात आहेत. उर्वरित पाणंद (खड्ड्यांचे रस्ते) याबाबत न बोललेलेच बरे. जिंतूर नाका, जाम नाका, बसस्थानक परिसर, शिवाजी पुतळा या चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सिग्नल सुरु करण्यात आले आहेत. अधूनमधून शिवाजी चौकातही सिग्नलची उघडझाप सुरु असते. प्रशासनाच्या दट्ट्यापुढे सिग्नल सुरु करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु, विपरितच घडत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने ऐनपावसाळ्यात लोकांना रस्त्यावर भिजावे लागत आहे. मनपा प्रशासन पोलिसांना, पोलिस वाहनचालकांना दोष देत अपयशाचे खापर परस्परांवर फोडताना दिसते. वाहतूक शाखेने सिग्नल तोडणाऱ्यांना शालीतून मारण्याच्या हेतुने गुलाबपुष्प दिले. परंतु, आता ते फुलांची किंमत दंड रुपाने वसूल करु लागले आहेत. शहरातील अरुंद रस्ते सिग्नलसाठी खऱ्या अर्थाने अडसर ठरत आहेत. रस्तेच धड नाहीत. मग सिग्नलचा शो कशाला, असा सवाल नागरिक करीत आहेत. ‘कंटीनिव्ह लेफ्ट’ चा नियम कुणीही पाळताना दिसत नाही. डाव्या बाजूने होणारी सलग वाहतूक ठिकठिकाणी बंद पडत आहे. पोलिस यंत्रणा याबाबत वाहनचालकांना कुठल्याच सूचना देत नाही. परिणामी वाहतूक अधिकच विस्कळीत होत आहे. शिवाजी पुतळ्याजवळून स्टेशनकडे जाताना डाव्या बाजूला पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंत व त्याच ठिकाणी तयार झालेला मोठा खड्डा, डाव्या बाजूच्या वाहतुकीला खीळ घालीत आहे. तर वसमतरोडकडे जाताना पत्रकार भवन व त्या लगतच्या दुकानाची ओटे अडसर ठरत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. सिग्नलचा आग्रह धरणाऱ्या मनपाने रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिपाक आहे. बसस्थानक परिसरात सिग्नलची काडीमात्र गरज नाही. या ठिकाणी चौक देखील नाही. परंतु, सिग्नल सुरु करण्यात आले. डॉक्टरलेनकडून येणारा रस्ता आजही वाहतुकीला योग्य नाही. सिग्नलमुळे वाहनांची कोंडी होऊन उड्डाणपुलापर्यंत रांगाच रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना बसस्थानकात घुसणे देखील कठीण होऊन बसले आहे. यातच वाहनतळ सोडून रस्त्यालगत उभ्या असलेल्या आॅटोरिक्षा, हातगाडे वाहतुकीचा खेळखंडोबा करीत आहेत. जिंतूररोडवरील महाराणा प्रताप चौकात सिग्नल असताना पुन्हा जाम नाका येथे नव्याने सिग्नल सुरु करुन मनपाने काय साध्य केले? दोन सिग्नलमध्ये किती अंतर असावे, याचा विचार झालेला नाही.४शहरातील इतरही सिग्नल सुरु करण्याचा मनपाचा मनोदय आहे. त्यांचीही अशीच अवस्था झाल्यास वाहनधारकांना फारमोठी शिक्षा मिळणार आहे. मनपा व शहर वाहतूक शाखेने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.