शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

टोपेंच्या किल्ल्यास शिवसेनेचा सुरूंग!

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

शेषराव वायाळ , परतूरपाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 शेषराव वायाळ , परतूर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेस मोठे मताधिक्य दिलेल्या परतूर विधानसभा मतदारसंघापाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत निवडून आलेले खासदार भलेही पक्ष सोडून गेले तरीही या मतदारसंघाने शिवसेनेच्या उमेदवारास कायम मताधिक्य देण्याचा धर्म सोडला नाही. वास्तविकता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी या मतदारसंघांतर्गत राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. गेल्या निवडणुकीत आ. सुरेश जेथलिया हे शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. विशेषत: उमेदवारी आणण्यापासून ते विजयाचेही जेथलिया शिल्पकार होते. मात्र, यावेळी काँग्रेसशी संलग्न असणार्‍या जेथलियांनी आघाडीचा धर्म पाळला. मात्र, उपयोग झाला नाही. सर्वसामान्य मतदारांनी बदललेल्या राजकीय समीकरणांकडे साफ दुर्लक्ष करीत, शिवसेनेमागे भक्कम समर्थन उभे केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे हे स्वकीय व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यातच दंग होते. अथक् प्रयत्न करूनही भांबळेंना यश पदरी पडले नाही. वास्तविकता भांबळे यांना मंठा भागातून मोठ्या मतांची अपेक्षा होती. नाते-गोते व आप्तांवरच भिस्त होती. बदललेल्या समीकरणांचासुद्धा मोठा फायदा होईल, अशी आशा भांबळे बाळगून होते. परंतु, या भांबळेंना या भागाने कौल दिला नाही. किंवा बरोबरीतपर्यंतसुद्धा आणले नाही. ग्रामीण भागात आ. जाधव यांना जोरदार साथ दिली. वास्तविकता या मतदारसंघात लढत तोडीची वाटली. विजयाची खात्री ठामपणे कोणीच देऊ शकणार नाही, असे चित्र होते. पण मोदी लाटेवर जाधव हे स्वार झाले. भांबळे घायाळ झाले. घनसावंगीत शिवसेनेने मारली बाजी गेल्या निवडणुकीत घनसावंगीतून राष्ट्रवादीस मोठे मताधिक्य मिळाले होते. पालकमंत्री टोपे यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कपणे राहील, असे अपेक्षित होते. भांबळे यांची संपूर्ण दारोमदार टोपे यांच्यावरच पूर्णत: अवलंबून होती. या निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून टोपे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, सर्वसामान्य मतदारांनी टोपे यांचे ऐकले नाही. या मतदारसंघांतर्गत शहरी व ग्रामीण भाग पूर्णत: शिवसेनेच्या पाठीशी राहिला, असे सकृतदर्शनी चित्र समोर आले आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे टोपेंना धक्काच मानला जात आहे. जिंतूर पाठोपाठ घनसावंगीतुनच भांबळेंना मोठी ‘लीड’ अपेक्षित होती. ती अपेक्षा टोपेंच्या प्रभावक्षेत्रात फोल ठरली, शिवसेनेचे बाजी मारली. या भागातील शिवसेनेच्या नेतृत्वाचे हे यश आहे.