शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

टोपेंच्या किल्ल्यास शिवसेनेचा सुरूंग!

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

शेषराव वायाळ , परतूरपाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 शेषराव वायाळ , परतूर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेस मोठे मताधिक्य दिलेल्या परतूर विधानसभा मतदारसंघापाठोपाठ पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या घनसावंगीनेही यावेळी शिवसेनेस मोठे मताधिक्य दिल्याने काँग्रेस आघाडीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत निवडून आलेले खासदार भलेही पक्ष सोडून गेले तरीही या मतदारसंघाने शिवसेनेच्या उमेदवारास कायम मताधिक्य देण्याचा धर्म सोडला नाही. वास्तविकता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी या मतदारसंघांतर्गत राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. गेल्या निवडणुकीत आ. सुरेश जेथलिया हे शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. विशेषत: उमेदवारी आणण्यापासून ते विजयाचेही जेथलिया शिल्पकार होते. मात्र, यावेळी काँग्रेसशी संलग्न असणार्‍या जेथलियांनी आघाडीचा धर्म पाळला. मात्र, उपयोग झाला नाही. सर्वसामान्य मतदारांनी बदललेल्या राजकीय समीकरणांकडे साफ दुर्लक्ष करीत, शिवसेनेमागे भक्कम समर्थन उभे केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे हे स्वकीय व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यातच दंग होते. अथक् प्रयत्न करूनही भांबळेंना यश पदरी पडले नाही. वास्तविकता भांबळे यांना मंठा भागातून मोठ्या मतांची अपेक्षा होती. नाते-गोते व आप्तांवरच भिस्त होती. बदललेल्या समीकरणांचासुद्धा मोठा फायदा होईल, अशी आशा भांबळे बाळगून होते. परंतु, या भांबळेंना या भागाने कौल दिला नाही. किंवा बरोबरीतपर्यंतसुद्धा आणले नाही. ग्रामीण भागात आ. जाधव यांना जोरदार साथ दिली. वास्तविकता या मतदारसंघात लढत तोडीची वाटली. विजयाची खात्री ठामपणे कोणीच देऊ शकणार नाही, असे चित्र होते. पण मोदी लाटेवर जाधव हे स्वार झाले. भांबळे घायाळ झाले. घनसावंगीत शिवसेनेने मारली बाजी गेल्या निवडणुकीत घनसावंगीतून राष्ट्रवादीस मोठे मताधिक्य मिळाले होते. पालकमंत्री टोपे यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कपणे राहील, असे अपेक्षित होते. भांबळे यांची संपूर्ण दारोमदार टोपे यांच्यावरच पूर्णत: अवलंबून होती. या निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून टोपे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, सर्वसामान्य मतदारांनी टोपे यांचे ऐकले नाही. या मतदारसंघांतर्गत शहरी व ग्रामीण भाग पूर्णत: शिवसेनेच्या पाठीशी राहिला, असे सकृतदर्शनी चित्र समोर आले आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे टोपेंना धक्काच मानला जात आहे. जिंतूर पाठोपाठ घनसावंगीतुनच भांबळेंना मोठी ‘लीड’ अपेक्षित होती. ती अपेक्षा टोपेंच्या प्रभावक्षेत्रात फोल ठरली, शिवसेनेचे बाजी मारली. या भागातील शिवसेनेच्या नेतृत्वाचे हे यश आहे.