शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-खोतकर

By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST

जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे

जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे तशी मदत अद्यापही होत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबतच असल्याची भूमिका यापुर्वीही मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी वेळप्रसंगी लढा देऊ, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी शनिवारी येथे केले. विधानसभा अधिवेशनात गुरूवारी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल जालना परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आ. खोतकर यांचा त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आ. खोतकर पुढे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही. मात्र हाच मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारकडून मदतीचा हात आखडता घेतला जातो. सरकारचे जे चुकते, तेच आपण विधानसभेच्या सभागृहात बोललो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, दुधाचे भाव ठरविणारे सरकार कोण? असा सवालही आपण केल्याचे खोतकर यांनी सांगितले. यावेळी जि.प. सभापती ए.जे. बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारला दखल घ्यावीच लागेल असे सांगितले. रघुनाथ गोल्डे, माधवराव टकले यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, भानुदास घुगे, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते, बाबूराव शिंदे, दिनेश फलके, हरिहर शिंदे आदींची उपस्थिती होती.