शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-खोतकर

By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST

जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे

जालना : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राज्यात भाजपा, सेनेला आपला कौल दिला. मात्र गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झालेले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारकडून पाहिजे तशी मदत अद्यापही होत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबतच असल्याची भूमिका यापुर्वीही मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी वेळप्रसंगी लढा देऊ, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी शनिवारी येथे केले. विधानसभा अधिवेशनात गुरूवारी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल जालना परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आ. खोतकर यांचा त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आ. खोतकर पुढे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही. मात्र हाच मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारकडून मदतीचा हात आखडता घेतला जातो. सरकारचे जे चुकते, तेच आपण विधानसभेच्या सभागृहात बोललो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, दुधाचे भाव ठरविणारे सरकार कोण? असा सवालही आपण केल्याचे खोतकर यांनी सांगितले. यावेळी जि.प. सभापती ए.जे. बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारला दखल घ्यावीच लागेल असे सांगितले. रघुनाथ गोल्डे, माधवराव टकले यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, भानुदास घुगे, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते, बाबूराव शिंदे, दिनेश फलके, हरिहर शिंदे आदींची उपस्थिती होती.