शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

५७ गावांत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे.

लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे. त्यापैकी २६ प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी पाठविले असून, चार गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यापैकी एका टँकरने जिल्ह्यातील एका गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील २१, निलंगा तालुक्यातील ९, रेणापूर तालुक्यात ३, अहमदपूर तालुक्यात ८, जळकोट तालुक्यात १ अशा एकूण ५७ गावांत पाणीटंचाईची ओरड होत आहे. जिल्ह्यातील १४ गावांचे तसेच एका वाडीवरून अधिग्रहणाची मागणी आली आहे. यापूर्वी २६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली होती. त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या ३० गावांत तीव्र पाणीटंचाई असून, एका वाडीवरही भीषण पाणीटंचाई आहे. तर अन्य ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. यापूर्वी अधिग्रहणाचे आठ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही जिल्ह्यातील आठ गावांनी केली आहे. त्यात लातूर तालुक्यातील तीन, औसा तालुक्यातील दोन आणि अहमदपूर तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला असून, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार आहे. या कृती आराखड्यानुसार अधिग्रहण करणे, विंधन विहिरी व बोअरची दुरुस्ती करणे, नव्या विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.ज्या गावांचे प्रस्ताव आले आहेत, त्या गावांत पाणीटंचाईची सत्यता पडताळून उपाययोजना करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे. प्रस्ताव घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत. नव्याने ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग या ५७ गावांतील पाणीटंचाईच्या स्त्रोतांची पाहणी करीत आहे. शिवाय, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)