शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

५७ गावांत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे.

लातूर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट असून, सध्या ५७ गावांमधून अधिग्रहणाची मागणी होत आहे. त्यापैकी २६ प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी पाठविले असून, चार गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यापैकी एका टँकरने जिल्ह्यातील एका गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील २१, निलंगा तालुक्यातील ९, रेणापूर तालुक्यात ३, अहमदपूर तालुक्यात ८, जळकोट तालुक्यात १ अशा एकूण ५७ गावांत पाणीटंचाईची ओरड होत आहे. जिल्ह्यातील १४ गावांचे तसेच एका वाडीवरून अधिग्रहणाची मागणी आली आहे. यापूर्वी २६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली होती. त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या ३० गावांत तीव्र पाणीटंचाई असून, एका वाडीवरही भीषण पाणीटंचाई आहे. तर अन्य ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. यापूर्वी अधिग्रहणाचे आठ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही जिल्ह्यातील आठ गावांनी केली आहे. त्यात लातूर तालुक्यातील तीन, औसा तालुक्यातील दोन आणि अहमदपूर तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला असून, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार आहे. या कृती आराखड्यानुसार अधिग्रहण करणे, विंधन विहिरी व बोअरची दुरुस्ती करणे, नव्या विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.ज्या गावांचे प्रस्ताव आले आहेत, त्या गावांत पाणीटंचाईची सत्यता पडताळून उपाययोजना करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे. प्रस्ताव घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत. नव्याने ५७ गावांतून अधिग्रहणाची मागणी झाली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग या ५७ गावांतील पाणीटंचाईच्या स्त्रोतांची पाहणी करीत आहे. शिवाय, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)