शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात !

By admin | Updated: March 30, 2015 00:41 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विशेषत: खून व बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा ढवळून निघत आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विशेषत: खून व बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा ढवळून निघत आहे़ अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार चिंतेची बाब बनली आहे़ काटगाव, दापेगाव, मुरुडच्या लाजीरवाण्या घटनांनी काळीमा फासला आहे़ वलांडीतील मुख्याध्यापकाच्या खून प्रकरणातील एक आरोपी व काटगाव बलात्कार प्रकरणातील संस्थाचालक अद्यापही मोकाटच असल्याने लातूरच्या पोलिसांवर दडपण वाढलेले आहे़लातूर तालुक्यातील काटगाव येथील साने गुरुजी आश्रमशाळेचा संस्थापक लातूरच्या पोलिसांना गुंगारा देऊन बेपत्ता झाला आहे़ गेल्या चार दिवसांपासून त्याचा शोध घेण्यात लातूरचे पोलिस असमर्थ ठरले आहेत़ तसेच देवणी तालुक्यातील वलांडी येथील मुख्याध्यापकाचे प्रेत लातूरच्या एलआयसी कॉलनी भागात सापडले़ या खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही़ तसेच ग्रामीण भागातही खोलवर पाळेमुळे रोवलेल्या मटका जुगारांवर नियंत्रण ठेवण्यातही त्या-त्या ठाण्यातील पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेतील पोलिसांच्या कारवायावरुन दिसत आहे़ अवैध धंदे चालू आहेत की नाहीत, याची माहिती त्या-त्या ठाण्यातील पोलिसांना दिसत नाहीत़ काही ठिकाणी तर गुन्हेगार व पोलिसांचीच छुपी मैत्री त्या-त्या परिसरातील हॉटेल व पानपट्ट्यांवर उजागर होत असते़ त्यामुळे नवीन गुन्हेगारी पिढी उदयास येत आहे़लातूर जिल्ह्यात काटगाव, दापेगाव, मुरुड येथील घटनांकडे पाहिले असता निराश्रीत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी कोण घालत आहे, याचाही तपास करावे लागते़ दहा-बारा वर्षांच्या चिमुकल्या कळ्यांना खुडण्याचे काम करणाऱ्या आरोपींवर कोणाचाही धाक राहिलेला नाही़ २५ मार्च रोजी काटगाव येथील साने गुरुजी आश्रमशाळेतील १२ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला़ त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी २७ मार्च रोजी औसा तालुक्यातील दापेगाव येथील ११ वर्षीय मुलीवर घराजवळील नराधमाने बलात्कार केला़ तसेच मुरुड येथील १५ वर्षीय मुलीवरही बलात्कार झाल्याची घटना २७ मार्च रोजी उघडकीस आली़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे़