शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शास्त्रज्ञ

By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST

परभणी: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली आहे.

परभणी: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली आहे. २ सप्टेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती समस्यांचे निवारण शास्त्रज्ञ करणार आहेत. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ३ वर्षांपूर्वी विद्यापीठ आपल्या दारी ही मोहीम सुरु केली. विद्यापीेठाच्या चार भिंतीत झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण शेतातच व्हावे, या उद्देशाने तत्कालीन कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि राज्यात मोहिमेचा नावलौकिक झाला होता. सलग तीन वर्षे ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे यश लक्षात घेऊन कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेस्वरलू आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आठही जिल्ह्यात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात विशेष पीक संरक्षण हा विषय समोर ठेवण्यात आला आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतांना भेटी देतील. सद्य परिस्थितीत पीकसंरक्षण आणि आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करतील. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या काळात ही मोहीम राबविली जाणार असून मोहिमेचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेस्वरलू यांच्या हस्ते होईल. संपूर्ण मराठवाड्याचे नियोजन करण्यात आले असून पथकांचीही बांधणीही करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये शास्त्रज्ञ, संशोधक यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी)