शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

परीक्षेसाठी प्रवास करणार्‍यांची झाली ‘सत्त्वपरीक्षा’

By admin | Updated: May 12, 2014 00:41 IST

औरंगाबाद : टपाल खात्याची परीक्षा झाल्यानंतर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावरून परतीचा प्रवास करताना विद्यार्थी आणि पालकांची रविवारी मोठी तारांबळ झाली. परीक्षेसाठीचा हा प्रवास सगळ्यासाठी परीक्षेचा ठरला

औरंगाबाद : टपाल खात्याची परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर परीक्षा केंद्र गाठताना आणि पेपर झाल्यानंतर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावरून परतीचा प्रवास करताना विद्यार्थी आणि पालकांची रविवारी मोठी तारांबळ झाली. परीक्षेसाठीचा हा प्रवास सगळ्यासाठी परीक्षेचा ठरला. टपाल खात्यात विविध पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणांसह १३ जिल्ह्यांतील विद्यार्थी या परीक्षेसाठी शहरात आले होते. अनेक विद्यार्थ्यांसह पालक आणि त्यांचे नातेवाईकही आले होते. रेल्वे आणि एस. टी. ने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते. शहरात दाखल झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी त्यांना रिक्षांचा आधार घ्यावा लागला. दुपारी दोन ते चार यावेळेत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर मात्र, परिस्थिती आणखीन बिकट झाली. रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना रिक्षांची शोधाशोध करावी लागली. अनेकांनी पायीच रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक गाठले. सायंकाळी एकाच वेळी हजारो परीक्षार्थ्यांची रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दी झाली. रेल्वेस्थानकावर मराठवाडा एक्स्प्रेसने जाण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, पालकांची प्रचंड गर्दी दिसून आली. संपूर्ण स्थानक गर्दीने खचाखच भरले होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही रेल्वे आल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी आणि जागा मिळविण्यासाठी एकाच वेळी झुंबड उडाली. त्यामुळे उतरणार्‍या प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांमध्ये यावेळी वादही झाले. रेल्वेत बसण्यासाठी अनेकांनी आपत्कालीन खिडकीचा आधार घेतला. गर्दीमुळे निघालेली रेल्वे दोन वेळा थांबविण्यात आली. दरवाजात लटकून अनेकांनी परतीचा प्रवास केला.