शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ

By admin | Updated: April 22, 2015 00:39 IST

कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन,

कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन, तीन रूपये दिले आहेत़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बहुला (ताक़ळंब) येथील शेतकऱ्यांनी अनुदानापोटी आलेली रक्कम डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस परत करण्याचा निर्णय घेतला आहे़मागील चार-पाच वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान सोसावे लागत असून, पदरी निराशाच पडत आहे़ त्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ मध्ये रबी हंगामात बहुला येथील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचा हप्ता भरून संरक्षित करून घेतली होती़ मात्र, अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाने या कंपनीने केवळ ज्वारी या पिकास नुकसानभरपाई जाहीर केली आहे़ शेतकऱ्यांची अनुदान रक्कम जिल्हा बँकेच्या विविध शाखांना पाठविण्यात आले असून, याबाबतचे पत्र इटकूर शाखेतही आले आहे़ विमा रक्कम आल्याची माहिती मिळाल्यानंतर बहुला येथील शेतकरी विमा उचलण्यासाठी बँकेत आले़ मात्र, नुकसानभरपाईची रक्कम पाहता अनेकांनी संताप व्यक्त केला़ यामध्ये किमान १ रूपये ३१ पैसे तर कमाल ६ रूपये ६३ पैसे अशी भरपाई आल्याचे दाखविण्यात आले आहे़ ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रियाही सुरू होती़ तर संतापलेले शेतकरी अनुदान नको, अशी संतप्त प्रतिक्रिया देत होते़ इटकूर शाखेत बहुला येथील आत्माराम लक्ष्मण बिक्कड यांना २ रूपये ८२ पैसे, हशमोद्दीन शमशोद्दीन शेख यांना १ रूपया ३१ पैसे, बलभीम नामदेव शेळके यांना ३ रूपये ७५ पैसे, अर्जुन नामदेव शेळके यांना २ रूपये ८२ पैसे तर पाथर्डी येथील कोंडीबा मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, अंगद मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, आढाळा येथील अरूण भगवान हारे यांना १ हेक्टर ३७ आर एवढ्या क्षेत्रासाठी १८ हजार ३५६ रूपये एवढ्या विमा संरक्षित रक्कमेपोटी केवळ ३४९ रूपयांचा हप्ता भरला होता़ यापोटी वरील सात शेतकऱ्यांना २५ रूपये ७१ पैसे एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ ही रक्कम पाहता शेतकऱ्यांनी शासनाच्या व कंपनीच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत मोठा संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)