शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ

By admin | Updated: April 22, 2015 00:39 IST

कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन,

कळंब : मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या काही शेतकऱ्यांना मागील रबी हंगामाच्या संरक्षित पिकांच्या विम्यापोटी दोन, तीन रूपये दिले आहेत़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बहुला (ताक़ळंब) येथील शेतकऱ्यांनी अनुदानापोटी आलेली रक्कम डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस परत करण्याचा निर्णय घेतला आहे़मागील चार-पाच वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान सोसावे लागत असून, पदरी निराशाच पडत आहे़ त्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ मध्ये रबी हंगामात बहुला येथील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचा हप्ता भरून संरक्षित करून घेतली होती़ मात्र, अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाने या कंपनीने केवळ ज्वारी या पिकास नुकसानभरपाई जाहीर केली आहे़ शेतकऱ्यांची अनुदान रक्कम जिल्हा बँकेच्या विविध शाखांना पाठविण्यात आले असून, याबाबतचे पत्र इटकूर शाखेतही आले आहे़ विमा रक्कम आल्याची माहिती मिळाल्यानंतर बहुला येथील शेतकरी विमा उचलण्यासाठी बँकेत आले़ मात्र, नुकसानभरपाईची रक्कम पाहता अनेकांनी संताप व्यक्त केला़ यामध्ये किमान १ रूपये ३१ पैसे तर कमाल ६ रूपये ६३ पैसे अशी भरपाई आल्याचे दाखविण्यात आले आहे़ ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रियाही सुरू होती़ तर संतापलेले शेतकरी अनुदान नको, अशी संतप्त प्रतिक्रिया देत होते़ इटकूर शाखेत बहुला येथील आत्माराम लक्ष्मण बिक्कड यांना २ रूपये ८२ पैसे, हशमोद्दीन शमशोद्दीन शेख यांना १ रूपया ३१ पैसे, बलभीम नामदेव शेळके यांना ३ रूपये ७५ पैसे, अर्जुन नामदेव शेळके यांना २ रूपये ८२ पैसे तर पाथर्डी येथील कोंडीबा मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, अंगद मुरलीधर बसाळगे यांना ५ रूपये ६३ पैसे, आढाळा येथील अरूण भगवान हारे यांना १ हेक्टर ३७ आर एवढ्या क्षेत्रासाठी १८ हजार ३५६ रूपये एवढ्या विमा संरक्षित रक्कमेपोटी केवळ ३४९ रूपयांचा हप्ता भरला होता़ यापोटी वरील सात शेतकऱ्यांना २५ रूपये ७१ पैसे एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ ही रक्कम पाहता शेतकऱ्यांनी शासनाच्या व कंपनीच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत मोठा संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)