शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

रुद्रेश्वर बंधाऱ्याच्या भिंतीला धोका

By admin | Updated: September 14, 2014 00:20 IST

सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे.

सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, गलवाडा येथील ग्रामस्थांनी चारी खोदून पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सोयगाव येथून जवळच गलवाडा गावाजवळ रुद्रेश्वर लेणीच्या पायथ्याशी एक पाझर तलाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा हा बंधारा सन १९९२ नंतर पहिल्यांदाच भरला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या पाझर तलावात यंदा प्रचंड पाणी साचले. तलावाला मोठ्या धरणाचे स्वरूप आले आहे. या तलावाचा सांडवा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहत नाही. आतापर्यंत जास्त पाणी न आल्यामुळे धोका जाणवला नाही; परंतु ७ व ८ रोजी झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची पातळी वाढली. सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे भिंतीच्या पिचिंगच्या किती तरी वर पाणी आले. दररोज पाणी वाढत आहे; परंतु पाणी बाहेर निघण्यास वाव नसल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरणाखालील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असेच पाणी वाढत राहिल्यास भिंतीवरून पाणी जाऊन धरण फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. धरणातील पाणी पाहता धरणाखालील शेतीसह गलवाडा गावालादेखील या धरणापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी सरपंच जीवन पाटील व मंडळ अधिकारी व्ही. टी. जाधव यांच्याकडे समस्या मांडली, तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. नंदू हजारी, विजय बिर्ला, कैलास इंगळे, दत्तू इंगळे, अशोक इंगळे, धनराज औरंगे, मुन्ना ढगे, रमेश गव्हांडे आदींनी चारी खोदून पाणी बाहेर काढले. या धरणाकडे विशेष लक्ष देऊन सांडव्याद्वारे पाणी कसे बाहेर पडेल, यासाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे.