शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पावसाने परतूर तालुका ओलाचिंंब

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

परतूर : परतूर तालुक्यात चार- पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकाच दिवसात ९३ मि. मी. पाऊस झाला. अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आला.

परतूर : परतूर तालुक्यात चार- पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकाच दिवसात ९३ मि. मी. पाऊस झाला. अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आला. शेतात पाणी भरले आहे. तर दुधना नदी दुथडी भरून वाहत असल्याने निम्न दुधना सिंचन प्रकल्पात ५३ टक्के पाणी साठा झाला आहे.परतूर तालुक्यात आठवडाभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणीच झाले आहे. नदया, नाल्यांना पुर येऊन शेतात पाणी भरले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिक पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सर्वदूर हेच चित्र असून, यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. विशेषत: हा पाऊस जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अति पावसाने पिके धोक्यात आली आहेत. शेतातील बांधबंदीस्ती फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामिण भागातील रस्ते उखडले आहेत. परतूर सर्कलमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १२० मि. मी. ची नोंद झाली. तर आष्टी ९८ मि. मी. सातोना १०८ मि. मी., श्रीष्टी ९० मि.मी., वाटूर ४८ मि.मी. मिळून एका दिवसात सरासरी ९२.८० टक्के पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्याची सरासरी पासाची नोंद ३९१. ८० मि. मी. झाली आहे. पारडगाव: घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारीही या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अतिपावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.या पावसाने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, येथील आठवडी बाजारात ठिक ठिकाणी पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (वार्ताहर) मंठा: तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थितीही नाजूक होती. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे. पावसामुळे बाजारपेठेतही चैतन्य आले आहे. सणा- सुदीत पाऊस पडल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. मंठा शहरासह तळणी, उस्वद, जयपूर, पांगरी गोसावी आदी भागात चांगला पाऊस झाला. कापूस, सोयाबीन पिके जोमात आहेत.नेर: जालना तालुक्यातील नेर परिसरातही या आठवड्यात चांगला पाऊस झाला. नदी, नाले, विहिरी, शेततळे पाण्याने तुडूंब भरले आहेत. या पावसामुळे परिसरातील पाणीटंचाईही काहीअंशी निकाली निघाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटला आहे. कापूस, सोयाबीन, मका तसेच भाजीपाल्यास पावसामुळे फायदा झाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)