शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

रस्त्यांची कामे; शपथपत्र दाखल करा

By admin | Updated: July 8, 2014 01:06 IST

औरंगाबाद : शहरात नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाची प्रगती आणि रस्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत तपासण्यासाठी काय उपाययोजना केली

औरंगाबाद : शहरात नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाची प्रगती आणि रस्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत तपासण्यासाठी काय उपाययोजना केली, याविषयी १६ जुलैपर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांनी महानगरपालिकेला दिले.याचिकाकर्ते अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी गतवर्षी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात एक जनहित याचिका खंडपीठात दाखल केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखालील शहरातील विविध सहा रस्त्यांच्या कामांबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या याचिके वर पुन्हा ७ जुलै रोजी न्यायालयासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयाने विचारणा केली. तसेच जळगाव टी पॉइंट सिडको ते मुकुंदवाडीदरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील काही झाडे तोडण्यात आली किंवा तोडली जाणार आहेत. त्या झाडांच्या पुनर्रोपणाविषयी किंवा अन्य व्यवस्थेबाबत काय उपाययोजना केली, असा प्रश्न यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. यावेळी मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी न्यायालयास सांगितले की, शहरातील रस्त्यांची कामे दोन टप्प्यात करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पुणे मेसर्स क्रिएशन या एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित ठेकेदार रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत करार करणे आणि शुल्क ठरविण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले. या सर्व मुद्यांवर १६ जुलैपर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने महानगरपालिकेला दिले. तसेच औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाची माहितीही देण्याचे आदेश शासनाला खंडपीठाने दिले. यावेळी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद गोडभरले यांनी युक्तिवाद केला.