शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

शहरात चोर्‍यांचे सत्र पुन्हा सुरू

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. भर दिवसा घरफोडी, लुटमारीचे प्रकार वाढले आहे.

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. भर दिवसा घरफोडी, लुटमारीचे प्रकार वाढले आहे. लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचीही धास्ती चोरटे बाळगत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा व शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात चंदन तस्करी, गांजा विक्री तसेच सट्टा व हवालामार्गे पैसे पाठविण्याला उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांचे काही गुन्हेगार आरोपींशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची जाणीव होत आहे. शहरात भर दिवसा घर फोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: पोलिस चौकी अथवा उच्चभू्र वसाहतील चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस अधीक्षकांनी छापा मारण्यासाठी तयारी सुरू केल्यानंतर लगेच संबंधिताला ‘टिप’ दिली जात असल्याची चर्चा आहे. त्याचे महत्वाचे कारण असे की, काही आरोपी अनेक गुन्ह्यात अडकलेले आहेत. ते अजूनही मोकाट फिरत असून त्यांच्यावर छापा मारण्यासाठी केलेली तयारी पूर्णत: अयशस्वी ठरली आहे. मात्र आरोपी लोकांच्या दृष्टीला कायम पडत आहेत. केवळ पोलिसांचा छापा टाकण्याच्यावेळी गायब दिसून येत आहेत. पोलिस दलातील घट्ट मैत्रीच त्याला करणीभूत ठरत असल्याचा दावा पोलिस दलातील ‘इमानदार’ अधिकारी व कर्मचार्‍यांचा आहे. हुजरेगिरी करून उखळ पांढरे करून घेण्याचा फंडा पोलिस दलात वाढीस लागत आहे. त्यामुळे काही गुन्हेगारांना जाणीवपूर्वक चांगली वागणूक दिली जात आहे. छापे मारण्यापूर्वी पूर्व कल्पना दिली जात असल्याचे माहितगार सूत्रांनी सांगितले. त्यासाठी छापा मारण्यापूर्वी पोलिस अधीक्षकांनी संपूर्ण माहिती गोळा करून पथकाला सज्ज राहण्यास सांगावे. कोठे जायचे आहे, हे अगदी वेळेवर सांगतांना छापा पथकातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याची गरज आहे. छापा मारण्याची बातमी त्यामुळे ‘लिक’ होणार नाही. आरोपींना ‘टीप’ देणार्‍यांवरही कडक कारवाई होण्याची गरज आहे. गुप्तता बागळून छापे मारले तरच गुन्हेगारीवर वचक बसविता येणे शक्य आहे, असा दावा जाणकार पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरातील प्रमुख चौक व बसस्थानकांत लुटमारीचे प्रकार वाढले आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बसमधून उतरलेल्या प्रवशास बेदम मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम लांबविण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस चौकीसमोर ही घटना घडली. रात्रीच्या वेळी येथील पोलिस चौकी बंद होती. गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत. एकूणच पोलिसांची जनतेचा मित्र म्हणून ओळख असली तरी वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)