शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

विकासाचा संकल्प-२0१५

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही नवनिर्वाचितांना विकासाच्या टिप्स दिल्या.या कार्यक्रमास गुजराथी यांच्यासह खा.राजीव सातव, आ.तानाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, यास्मिनबेगम, भगवान कुदाळे, पं.स.सभापती महानंदा लोणे, सीताबाई राठोड, जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख, शिवाजी मस्के आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सभागृहात उपस्थितांनी जिल्ह्यातील क्रीडा, उद्योग, सिंचन, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडले. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केले. त्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सूर्यतळ म्हणाल्या, शहरातील रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तर आ.टारफे म्हणाले, पक्षभेद विसरून आम्ही जिल्हा विकासासाठी एकत्र येऊ. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, सिंचनाचा प्रश्न हा प्राधान्याचा विषय आहे. येत्या वर्षभरात तो मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. पक्षभेद विसरून त्यासाठी काम करावे लागणार आहे. याशिवाय हिंगोली शहराच्या विकासासाठी पालिकेने पुढाकार घेतल्यास मदतीसाठी तयार आह, असेही मुटकुळे यांनी सांगितले.त्यानंतर आ.वडकुते यांनीही सिंचनाच्याच मुद्याला हात घातला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. खा.राजीव सातव यांनी चांगली माणसे राजकारणात आली पाहिजे, टिकली पाहिजे, असे सांगितले. तर मागील निवडणुकीत ‘गांधी’ची चलती असल्याच्या अनुभवावर चिंता व्यक्त केली. कन्हेरगाव-नांदेड रस्त्याचे काम एका वर्षानंतर सुरू होईल. सध्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासाठी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी तीनदा भेटल्याचेही ते म्हणाले. रेल्वे, पोस्ट, दूरसंचार या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे आगामी वर्ष, दोन वर्षांत ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बँकांचे जाळे, लघुउद्योग, अद्ययावत क्रीडासंकुलांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हाधिकारी गगराणी व मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन वसंतकुमार भट्ट यांनी केले.