शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

विकासाचा संकल्प-२0१५

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही नवनिर्वाचितांना विकासाच्या टिप्स दिल्या.या कार्यक्रमास गुजराथी यांच्यासह खा.राजीव सातव, आ.तानाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, यास्मिनबेगम, भगवान कुदाळे, पं.स.सभापती महानंदा लोणे, सीताबाई राठोड, जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख, शिवाजी मस्के आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सभागृहात उपस्थितांनी जिल्ह्यातील क्रीडा, उद्योग, सिंचन, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडले. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केले. त्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सूर्यतळ म्हणाल्या, शहरातील रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तर आ.टारफे म्हणाले, पक्षभेद विसरून आम्ही जिल्हा विकासासाठी एकत्र येऊ. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, सिंचनाचा प्रश्न हा प्राधान्याचा विषय आहे. येत्या वर्षभरात तो मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. पक्षभेद विसरून त्यासाठी काम करावे लागणार आहे. याशिवाय हिंगोली शहराच्या विकासासाठी पालिकेने पुढाकार घेतल्यास मदतीसाठी तयार आह, असेही मुटकुळे यांनी सांगितले.त्यानंतर आ.वडकुते यांनीही सिंचनाच्याच मुद्याला हात घातला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. खा.राजीव सातव यांनी चांगली माणसे राजकारणात आली पाहिजे, टिकली पाहिजे, असे सांगितले. तर मागील निवडणुकीत ‘गांधी’ची चलती असल्याच्या अनुभवावर चिंता व्यक्त केली. कन्हेरगाव-नांदेड रस्त्याचे काम एका वर्षानंतर सुरू होईल. सध्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासाठी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी तीनदा भेटल्याचेही ते म्हणाले. रेल्वे, पोस्ट, दूरसंचार या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे आगामी वर्ष, दोन वर्षांत ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बँकांचे जाळे, लघुउद्योग, अद्ययावत क्रीडासंकुलांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हाधिकारी गगराणी व मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन वसंतकुमार भट्ट यांनी केले.