शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पुन्हा भारनियमन

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऐन नवरात्रीमध्ये भारनियमन सुरु केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संपूर्ण राज्यभरात कोठे, किती वीज पाठवायची याचा सर्वस्वी निर्णय ठाणे जिल्ह्यातील एैरोली येथील केंद्राकडून घेतला जातो. गेल्या महिन्यात सर्वत्र पाऊस झाला. यानंतर सध्या कडक उन्हास नागरिक सामोरे जात आहेत. यातच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात पावसाने काहीसा ताण दिल्यानंतर शेतातील पिकांसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा आवश्यक आहे. या महिन्यात शेतीपंपाच्या अचानक वाढलेल्या वापरामुळे सर्वत्र विजेची मागणी व पुरवठा यात तफावत होत आहे. या कारणास्तव सदरील भारनियमन सुरु करण्यात आले असले तरी महावितरणला नवरात्रीचा विसर पडलेला आहे. सक्तीचे भारनियमन परभणी शहर व ग्रामीण भागात काही दिवसांपासून सुरु करण्यात आले. यात शहरी भागात साडेपाच तास तर ग्रामीण भागात आठ ते नऊ तास भारनियमनास सुरुवात झाली आहे. परभणी शहर विभागाचे १८ फिडर असून यातील आठ फिडर संपूर्णत: भारनियमनमुक्त आहेत. परंतु, या सक्तीच्या भारनियमनात आठ फिडरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसताना ग्राहकांना वाढीव वीज बिल आकारण्यात येते. मीटर रिडींग न घेताच आरएनए किंवा डोअर लॉकच्या नावाखाली वाढीव बिल येत आहे. यासाठी ग्राहक बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारत आहेत. तर काही जणांना पूर्ण बिल भरुनही वाढीव बिल, जादा वापर युनिट लावण्यात येत आहेत. अशातच महावितरणने परभणीकरांना पुन्हा भारनियमनाचा दणका दिला आहे. सध्या निवडणुकीची धामधूम व नवरात्रोत्सव या सणासुदीच्या काळात होत असलेल्या भारनियमनाचा फटका मात्र नागरिक व शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)