शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भारनियमन

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऐन नवरात्रीमध्ये भारनियमन सुरु केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संपूर्ण राज्यभरात कोठे, किती वीज पाठवायची याचा सर्वस्वी निर्णय ठाणे जिल्ह्यातील एैरोली येथील केंद्राकडून घेतला जातो. गेल्या महिन्यात सर्वत्र पाऊस झाला. यानंतर सध्या कडक उन्हास नागरिक सामोरे जात आहेत. यातच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात पावसाने काहीसा ताण दिल्यानंतर शेतातील पिकांसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा आवश्यक आहे. या महिन्यात शेतीपंपाच्या अचानक वाढलेल्या वापरामुळे सर्वत्र विजेची मागणी व पुरवठा यात तफावत होत आहे. या कारणास्तव सदरील भारनियमन सुरु करण्यात आले असले तरी महावितरणला नवरात्रीचा विसर पडलेला आहे. सक्तीचे भारनियमन परभणी शहर व ग्रामीण भागात काही दिवसांपासून सुरु करण्यात आले. यात शहरी भागात साडेपाच तास तर ग्रामीण भागात आठ ते नऊ तास भारनियमनास सुरुवात झाली आहे. परभणी शहर विभागाचे १८ फिडर असून यातील आठ फिडर संपूर्णत: भारनियमनमुक्त आहेत. परंतु, या सक्तीच्या भारनियमनात आठ फिडरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसताना ग्राहकांना वाढीव वीज बिल आकारण्यात येते. मीटर रिडींग न घेताच आरएनए किंवा डोअर लॉकच्या नावाखाली वाढीव बिल येत आहे. यासाठी ग्राहक बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारत आहेत. तर काही जणांना पूर्ण बिल भरुनही वाढीव बिल, जादा वापर युनिट लावण्यात येत आहेत. अशातच महावितरणने परभणीकरांना पुन्हा भारनियमनाचा दणका दिला आहे. सध्या निवडणुकीची धामधूम व नवरात्रोत्सव या सणासुदीच्या काळात होत असलेल्या भारनियमनाचा फटका मात्र नागरिक व शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)