शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रक्ताच्या सह्यांचे निवेदन

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

लातूर : औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी लातुरातील विश्रामगृह येथे शिवसेना नेते रामदास कदम

लातूर : औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी लातुरातील विश्रामगृह येथे शिवसेना नेते रामदास कदम यांना रक्ताच्या स्वाक्षरीसह दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यामुळे शिवसेना नेते हादरुन गेले. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. चारा-पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. खरीप हंगाम हातचा गेला असून, रबीच्या पेरण्याही नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही, त्यामुळे कवडीमोल किंमतीत पशुधन शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. तरीही अद्याप शासनाकडून दुष्काळी उपाययोजना होत नाहीत. त्या तात्काळ कराव्यात, यासाठी शासनाला भाग पाडावे, अशा आशयाचे निवेदन रक्ताच्या स्वाक्षरीसह शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आ. रामदास कदम, दिवाकर रावते, आ. विजय शिवदामे, आ. कृष्णा घोडा, आ. ज्ञानेश्वर चौगुले, आ. शांताराम मोरे, आ.डॉ. बालाजी किनीकर आदींच्या उपस्थितीत लातूर येथे देण्यात आले. सह्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाहून उपस्थित शिवसेना नेते हादरून गेले. शासन दुष्काळ जाहीर करीत नाही व उपाययोजना करीत नाही, तोपर्यंत शिवसेना मंत्र्यांना फिरू देणार नाही, असे आश्वासन निवेदनकर्त्यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)रक्ताच्या स्वाक्षरीच्या निवेदनावर दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही रक्तानेच लिहिलेली होती. दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना तात्काळ सुरू कराव्यात, अशीही मागणी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांकडे केली.