शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

‘त्या’ खात्यावरील रक्कम परत करा

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने

उस्मानाबाद : विविध योजनांतर्गतचे लाभार्थी मयत असूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा होत असल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत अशा लाभार्थ्यांच्या नावे जमा असलेले अनुदान तातडीने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांना दिले आहेत. तसेच गारपीटीचे अनुदान वाटप न केलेल्या बँकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाच्या वतीने निराधारांसाठी श्रावणबाळ, संजय गांधी आदी योजना राबवून यातून त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनुदान दिले जाते. परंतु, संबंधितांना हे अनुदान वेळच्या वेळी मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी जिल्ह्यात बँकांकडे अशा अुनदानापोटी जमा झालेल्या रकमांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील बहुतांश बँकामधून शासकीय योजनेच्या विविध लाभार्थ्यांच्या नावे प्रशासनाकडून पैसे जमा करण्यात आले असले तरी बहुतांश बँकांकडून योग्य पध्दतीने वाटप होत नसल्याचे उघड झाले होते. तसेच काही बँकांमधील या योजनेअंतर्गतचे लाभार्थी मयत असतानाही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा असल्याचेही या पाहणीत दिसून आले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १२ हजार ३०१ लाभार्थी असून, त्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत २ कोटी ४५ लाख ४९० रूपये प्रशासनाच्या वतीने विविध बँकांत जमा करण्यात आले होते. १३ आॅक्टोबर रोजी बँकाची तपासणी केल्यानंतर तालुक्यातील ११५ मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ लाख ९२ हजार ६१० रूपये जमा असल्याचे उघडकीस आले. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत ही रक्कम तातडीने संबधित बँकेने प्रशासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)उमरगा येथील सहाय्यक निबंधक व गटविकास अधिकारी तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने उमरगा तालुक्यातील बँकाची तपासणी केली असता काही बँकांनी ग्राहकांकडून जादा सेवा शुल्क आकारणी केल्याचेही उघड झाले आहे. यात स्टेट बँक हैद्राबाद (दाळींब), बँक आॅफ महाराष्ट्र (येणेगूर), महाराष्ट्र ग्रामीण बँक (नाईचाकूर), स्टेट बँक आॅफ इंडिया (उमरगा), बँक आॅफ इंडिया (उमरगा), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (तुरोरी), स्टेट बँक आॅफ हैद्राबाद (मुरुम) या बँकानी सात टक्के पेक्षा जादा दराने व्याजाची आकारणी करून सेवा शुल्कापोटीही १ हजार ५० रूपये आकारल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौदा शाखा तसेच नाईचाकूर व आलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उमरगा शाखेतून गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप झाले नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गारपिटीचे अनुदान रखडले४तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गारपीटग्रस्त ५४ हजार ३६६ शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी ४०५५.८१ लक्ष एवढा निधी बँकांकडे वितरित करण्यात आला होता. यातील २२७.७२ लक्ष रुपये अद्यापही वाटप झाले नसून, त्या बँकांवरही आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.