शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रेल्वेगेट बंद करणारच...

By admin | Updated: March 31, 2015 00:35 IST

जालना : शहरातील नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील रेल्वेगेट बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन ठाम असून हे गेट सुरू ठेवायचे असल्यास

जालना : शहरातील नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील रेल्वेगेट बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन ठाम असून हे गेट सुरू ठेवायचे असल्यास नगरपालिकेने स्वखर्चातून त्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. मात्र, यासंबंधी या परिसरातील नागरिकांनी गेट बंद करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी उद्यानजवळील उड्डाणपूल, मुक्तेश्वर तलाव, नूतन वसाहत उड्डाणपूल आणि रेल्वेस्थानक परिसर असे चार रेल्वेगेट एक कि़मी. अंतराच्या आत आहेत. यामध्ये संभाजी उड्डाणपुलाजवळील गेट मागील काही वर्षांपासून बंद आहे. मात्र अन्य तीन रेल्वेगेटवर रेल्वे प्रशासनाला प्रतिवार्षिक ६० लाख रुपये खर्च करावा लागतो. नूतन वसाहत उड्डाणपुलाखालील गेटजवळ यापूर्वी अपघाताच्या काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांनी नूतन वसाहतजवळील गेट बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला. या प्रस्तावास मंजुरी मिळवून सदरील गेट बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबत जालना रेल्वेस्थानक प्रमुख वळवी म्हणाले की, नांदेड विभागीय व्यवस्थापकांनी रेल्वे गेट क्रमांक ७७ हे बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास दिला होता. त्यानुसार गेट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. (प्रतिनिधी)या रेल्वेगेटच्या मार्गावर वाहतुकीची सतत वर्दळ असते. विद्युत कॉलनी, सहकार बँक कॉलनी, मंमादेवीनगर, नूतन वसाहत इत्यादी परिसरात ये-जा करण्यासाठी बहुतांश वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. मात्र हे गेट बंद झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होणार असल्याचे सांगून या परिसरातील लोकांचा गेट बंद करण्यास विरोध असल्याचे नगरसेवक अशोक पवार यांनी सांगितले. ४याबाबत आ. अर्जुन खोतकर यांनीही गेट बंद करू नये, या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. यासंबंधी पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन सादर केले.