शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

रबीची पेरणी केवळ ४८ टक्के

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे.

राजेश खराडे , बीडना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. केवळ पिकांचा जनावरांसाठी चारा तरी व्हावा या उद्देशानेच रबी पिकांची पेरणी होत असल्याचे चित्र आहे. ज्वारी उगवून आली खरी मात्र पाऊस नसल्याने या पिकांची वाढ होत नाही बाटुक म्हणून चारा तरी मिळावा हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून याच्या पेरणीसाठी जमिनीत ओल असने आवश्यक आहे. जमिनीत ओल तर नाहीच परंतु आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीकरिता सुमारे ३ लाख ७८ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अद्यापपर्यंत १ लाख ८१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रबी पेरणी जवळपास संपुष्टात आली असल्याचे दिसत आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पिक असून सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचेच असते. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ नाख ८१ हजार ५२१ हेक्टरावर पेरणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५ टक्के रबीची पेरणी घाली आहे. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रबीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत येथील कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. रबी हंगामात ज्वार, गहू,मका, हरभरा, करडई, जवस, सूर्यफुल, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते.गतवर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी झाली होती. त्यावेळी जमिनीत ओल असल्याने रबीची पिके जोमात उगवली तरी होती मात्र यंदा पाऊसच नसल्याने रबी पिकातील पिकांची वाढ खुंटली आहे. आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली तर खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही वाया जाणार असल्याची भिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.