शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

रबीची पेरणी केवळ ४८ टक्के

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे.

राजेश खराडे , बीडना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. केवळ पिकांचा जनावरांसाठी चारा तरी व्हावा या उद्देशानेच रबी पिकांची पेरणी होत असल्याचे चित्र आहे. ज्वारी उगवून आली खरी मात्र पाऊस नसल्याने या पिकांची वाढ होत नाही बाटुक म्हणून चारा तरी मिळावा हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून याच्या पेरणीसाठी जमिनीत ओल असने आवश्यक आहे. जमिनीत ओल तर नाहीच परंतु आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीकरिता सुमारे ३ लाख ७८ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अद्यापपर्यंत १ लाख ८१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रबी पेरणी जवळपास संपुष्टात आली असल्याचे दिसत आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पिक असून सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचेच असते. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ नाख ८१ हजार ५२१ हेक्टरावर पेरणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५ टक्के रबीची पेरणी घाली आहे. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रबीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत येथील कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. रबी हंगामात ज्वार, गहू,मका, हरभरा, करडई, जवस, सूर्यफुल, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते.गतवर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी झाली होती. त्यावेळी जमिनीत ओल असल्याने रबीची पिके जोमात उगवली तरी होती मात्र यंदा पाऊसच नसल्याने रबी पिकातील पिकांची वाढ खुंटली आहे. आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली तर खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही वाया जाणार असल्याची भिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.