शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

रबी पिकाला अवकाळी तडाखा

By admin | Updated: February 12, 2015 00:55 IST

जालना : जिल्ह्यास मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड तालुक्यात ज्वारी, गहू,

जालना : जिल्ह्यास मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड तालुक्यात ज्वारी, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पत्रे उडली तसेच झाडे उन्मळून पडली.दोन महिन्यांपूर्वीच जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसता होता. त्यात खरीप तसेच रबी पिकांचे नुकसान झाले होते. घरांचीही पडझड झाली होती. आता पुन्हा अवकाळी नुकसान केले. या पावसाने ज्वारी, वेचणी केलेला कापूस, फळबागा, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. अंबड तालुक्यात रात्री अकरा वाजता अर्धातास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. सोनकपिंपळगाव, वडीलासुरा, शहागड, बारसवाडा, डोमेगाव, दुनगाव, चिंचखेड, वडीगोद्री, सुखापुरी, दाढेगाव, शेवगा, हस्तपोखरीसह अनेक गावात पाऊस झाला. पाऊस व वादळामुळे काही वेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. रबी हंगामातील ज्वारीचे अनेक ठिकाणी खळे सुरु आहेत. काही ज्वारीचे पीक शेतातच आहे.भोकरदन, फत्तेपूर, जोमाळा, मासनपूर, आलापूर, पेरजापूर, भिवपूर, इब्राहिमपूर नांजा, क्षीरसागर, तांदळवाडी, ताडकळस, बाभूळगाव, विरेगाव, दानापूर, मनापूर, मलकापूर, वाडी आदी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच तुरळक प्रमाणात गाराही पडल्या. या पावसात गहू, ज्वारी तसेच सीडस कांद्याचे मोठे नुकसान झाले.बदनापूर: तालुक्यात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात आलेल्या पिकांचे नुकसान झाले. परतूर: मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. ज्वारी व काही प्रमाणात गव्हाचे पीक खाली पडले. या वादळी पावसात रात्री काही काळ वीजपुरवठा विस्कळीत झाला. (ग्रामीण भागातील नुकसानीचे वृत्त पान तीनवर))अवकाळी पावसामुळे गहू तसेच ज्वारीचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगाम दुष्काळीमुळे तर रबी हंगाम अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे.मंगळवारच्या पावसामुळे गहू व ज्वारीचे नुकसान झाले. वेचणी केलेला शेकडो क्विंटल कापूस पावसामुळे भिजला.वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गहू, ज्वारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील अनेक गावांमधील घरांवरील पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली. अनेक घरांचेही नुकसान झाले. याबाबत बदनापूर येथे ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारपर्यंत तालुक्यातील पाच मंडळात किती पाऊस झाला याचा अहवाल आला नसल्याची माहिती अव्वल कारकुन दवणे यांनी दिली.