शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

२०१५-१६ साठी १३५ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: February 5, 2015 00:53 IST

जालना : २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा वार्षिक योजनेसाठी १३५.१६ कोटींचा निधी लहान गटाने प्रस्तावित केल्याने त्यास गुरुवारी होणाऱ्या जिल्हा

जालना : २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा वार्षिक योजनेसाठी १३५.१६ कोटींचा निधी लहान गटाने प्रस्तावित केल्याने त्यास गुरुवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ३१ मार्चअखेर पर्यंत पूर्ण न होऊ शकणाऱ्या काही खात्यांच्या निधी परत जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होत आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरीता १५० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व जिल्ह्यातील नियोजन मंडळांचा निधी कपात करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या १५ कोटींच्या निधीचा समावेश आहे. एकूण मंजुर १३५ पैकी ९१ कोटींचा निधी शासनाने आतापर्यंत बीडीएसवर उपलब्ध करून दिला असून उर्वरीत निधीही लवकरच उपलब्ध होणार आहे. २०१४-१५ चा १५ कोटींचा निधी दुष्काळी उपाययोजनांच्या कामासाठी वर्ग करण्यात आल्याने १३५ कोटींमध्येच कामे पूर्ण करावी लागणार आहेत. तर २०१५-१६ या वर्षाकरीताही एवढ्याच निधीची मर्यादा आहे. लहान गटाने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामध्ये कृषी व संलग्न सेवेसाठी २६.७६ कोटी, ग्रामीण विकास ७.६१ कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रण ८ कोटी, विद्युत व उर्जा विकास ४.१० कोटी, परिवहन २१.९२ कोटी, सामाजिक व सामुहिक सेवा ५३. २८ कोटी, नाविन्यपूर्ण योजना ६.२५ कोटी यांचा समावेश आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोणीकर यांच्याकडे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खाते असल्याने त्यासाठी काही विशेष निधीची तरतूद होईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिवसभर पूर्वतयारी सुरू होती. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला २०१४-१५ या वर्षासाठी ३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. मात्र या विभागाने कामांची निविदा प्रक्रियाच अद्याप केलेली नाही. त्यामुळे आगामी दीड महिन्यांच्या काळात हा निधी खर्च कसा होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचाही निधी खर्चित न झाल्याने या दोन्ही विभागांचा काही निधी परत जाण्याची शक्यता आहे.याबाबत सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी यांना विचारणा केली असता निधी परत जाणार किंवा नाही, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीची मागणी करताना मर्यादा घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.