शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

वाया जाणाऱ्या चाऱ्यावर प्रक्रिया; पशुधनाला सकस चारा !

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर

लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर प्रक्रिया करुन वाया जाणारा चारा वाचविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्याला दिले जात आहे़ हा उपक्रम जिल्ह्यातील ९४३ गावात राबविला जात असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीत या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळत आहे़ लातूर जिल्ह्यात एकूण पशुधनाचा आकडा ६ लाख १५ हजारांवर गेला आहे़ या पशुधनासाठी वर्षाकाठी ११ लाख मेट्रीक टन चारा लागतो़ परंतु या वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने एप्रिल पर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे़ यातही एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जातो़ हा वाया जाणारा चारा वापरात यावा़ या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सोयाबीन, तूर, हरभरा, बाजरी, मका, गहू या पिकांच्या गुळ्यापैकी १०० किलो गुळी घेऊन ४० लिटर पाणी, १ किलो युरीया, १० किलो गुळ, २ किलो मिनरल मिस्चर, फवारणी करुन (क्षारयुक्त पावडर) एकत्र करुन या गुळ्यावर फवारणी करुन त्या गुळ्याला झाकून १२ ते २४ तास ते गुळी हवाबंद ठेवल्यास, या गुळ्यातील अमोनिया निघून गेल्याने स्वादिष्ट गुळी तयार होते़ ही गुळी जनावरांसाठी वापरले गेल्यास वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण कमी होते़ (प्रतिनिधी)