शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

अध्यक्षांच्या दौऱ्यामुळे खड्ड्यांची डागडुजी

By admin | Updated: August 25, 2014 23:50 IST

बीड: येथील बसस्थानक समस्यांबाबत नेहमीच विविध कारणाने चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून येथील बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात आलेले नव्हते

बीड: येथील बसस्थानक समस्यांबाबत नेहमीच विविध कारणाने चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून येथील बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात आलेले नव्हते. मात्र रविवारी बसस्थानकाच्या भूमिपूजनासाठी मंत्र्यांची उपस्थिती लाभणार होती त्यामुळे स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी महामंडळातील संबंधित विभागाचा अधिकारी उजाडल्यापासूनच तळ ठोकून होता.रविवारी बीड येथील बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. हे मान्यवर भूमिपूजनासाठी येणार म्हटल्यानंतर येथील विभागीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानकातील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून स्थानकातील खड्डे दिसले नाहीत तेच अधिकारी रविवारी सकाळपासूनच स्थानकात तळ ठोकून होते. मंत्र्यांच्या गाड्यांना आदळा बसू नये म्हणून खड्डे बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य प्रवाशांच्या त्रासाची दखल नसल्याचे यावरून स्पष्ट होते. यापूर्वी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन केले. विभागीय नियंत्रकांना निवेदने दिली. नियंत्रकांनी संबंधित विभागाला खड्डे बुजविण्या संदर्भात पत्रही दिले. मात्र या पत्राला संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. दोन जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती बसस्थानक म्हणून या बसस्थानकाची ओळख आहे. मात्र याच बसस्थानकाची स्वच्छता व सुशोभिकरण पाहिले तर कोणालाही या बसस्थानकाबद्दल शंका आल्याशिवाय राहणार नाही. या बसस्थानकात प्रवाशांना कुठल्याच सोयी- सुविधा मिळत नाहीत. पिण्याच्या पाण्यापासून ते बसण्याच्या बाकड्यापर्यंत प्रवाशांचे हाल आहेत. नुसते प्रवाशांचेच हाल नाहीत तर महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होतात. (प्रतिनिधी)बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस गुडग्या एवढ्या पडलेल्या खड्डयांमध्ये मुरूम टाकून मलमपट्टी करण्यात आली. मुरूम टाकल्यानंतर ते दाबण्यासाठी रोलरऐवजी चक्क बसचाच वापर करण्यात आला. याकडे मात्र येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. मंत्र्यांच्या आगमनामुळे खड्डे बुजले खरे मात्र ते किती काळ टिकतात याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.कारण हे खड्डे बुजविण्यासाठी निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, निलेश उपाध्ये यांनी केला. यापूर्वी स्थानकातील व आगारातील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले होते. यावर कुठलेही डांबरीकरण करण्यात आले नाही. या निकृष्ट कामा बद्दल अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले होते. मात्र याची कुठलीही दखल महामंडळातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला घ्यावीसी वाटली नव्हती. मात्र रविवारी तोच अधिकारी उजाडल्यापासूनच स्थानकात तळ ठोकून होता. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.