शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

उसाच्या पहिल्या हप्त्यावरून राजकारण तापले

By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST

हरी मोकाशे , लातूर उसाचे प्रमाण घटल्याने यंदा जिल्ह्यातील केवळ चार सहकारी आणि चार खाजगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास गेल्या महिनाभरापासून सुरुवात झाली आहे़

हरी मोकाशे , लातूरउसाचे प्रमाण घटल्याने यंदा जिल्ह्यातील केवळ चार सहकारी आणि चार खाजगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास गेल्या महिनाभरापासून सुरुवात झाली आहे़ सहकारी साखर कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल म्हणून दीड हजार रुपये जाहीर केले आहे तर खाजगी तत्वावरील एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी अद्यापही पहिला हप्ता जाहीर केला नाही़ त्यामुळे शेतकरी धास्तावला असून ऊसाच्या पहिल्या हप्त्यावरुन राजकारण तापत आहे़जिल्ह्यात आठ सहकारी आणि चार खाजगी साखर कारखाने आहेत. यंदा ऊसाचे क्षेत्र घटल्याने मांजरा, विकास, विकास- २ आणि रेणा हे चार सहकारी साखर कारखाने सुरु आहेत़ खाजगी तत्त्वावरील अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर, पानगाव येथील पन्नगेश्वर, औसा तालुक्यातील श्री साईबाबा शुगर्स आणि तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर्स हे साखर कारखाने सुरु आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ६१ हजार ४७९ हेक्टर्स उसाचे क्षेत्र होते़ त्यामुळे २९ लाख ४ हजार मेट्रिक टन उसाचे दहा कारखान्यांनी गाळप केले. परंतु, ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे़ जिल्ह्यात ४६ हजार ३९७ हेक्टर्स असे ऊसाचे क्षेत्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन सहकारी साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले नाही़ गेल्या महिनाभरापासून ८ कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे़ त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा पहिल्या हप्त्याकडे लागून होत्या़ मांजरा आणि रेणा या दोन सहकारी साखर कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल म्हणून १ हजार ५०० रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत़ त्याचबरोबर जागृती शुगरनेही दीड हजार रुपयेच पहिली उचल जाहीर केली आहे़ विकास, विकास- २ या दोन्ही साखर कारखान्यांनी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही़ तसेच सिध्दी शुगर, पन्नगेश्वर, श्री साई बाबा या तिन्ही खाजगी कारखान्यांनी अद्यापही पहिला हप्ता जाहीर केला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ वास्तविक पहाता, मांजरा, रेणा या साखर कारखान्यांच्या कार्याचा गौरव देश पातळीवर झाला आहे़ त्यामुळे या साखर कारखान्यांकडून यंदा शेतकऱ्यांच्या मोठ्या आशा होत्या़ परंतु, पहिली उचल दीड हजार रुपये जाहीर केल्याने खाजगी कारखाने किती भाव देतील? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़गेल्या वर्षी मांजरा, विकास, रेणा, जागृती या कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल १८०० रुपये दिली होती तर प्रति टनास एकूण रक्कम २१५० रुपये दिली होती़ त्याचबरोबरच श्री साईबाबा कारखान्याने पहिली उचल १९०० रुपये, पन्नगेश्वरने १७०० रुपये, सिध्दी शुगरने पहिली उचल १८०० रुपये आणि एकूण भाव २०५० रुपये दिला होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही पहिली उचल दीड हजार रुपये देण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ उत्पन्न घटले़़़४दरवर्षी एकरी ३५ ते ४० टन ऊसाचे उत्पन्न होत होते़ परंतु, यंदा पाऊस नसल्याने ऊसाच्या वजनात व वाढीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ सध्या एकरी १८ ते २० टन असे ऊसाचे वजन होत आहे़ एकरभर उसासाठी जवळपास ३० हजार रुपये खर्च होतो़ खर्च आणि काही साखर कारखान्यांनी दिलेली उचल पाहता नगदी पीक असलेले ऊस परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली़४यंदा साखरेचे भाव उतरले आहेत़ त्यातच शासनाने अद्यापही कुठलेही धोरण घेतले नाही़ शासनाचे धोरण जाहीर होण्यापर्यंत शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही प्रति टन दीड हजार रुपये पहिली उचल ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याचे मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख यांनी सांगितले़शेतकऱ्यांवर दुहेरी संकट़़़४एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले आहेत़ त्यानुसार प्रति टनाला पहिला हप्ता १८०० रुपये मिळणे अपेक्षित असताना कारखान्यांकडून दीड हजार रुपये दर जाहीर करण्यात येतो़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत़ कारण अगोदर निसर्गाने मारले आणि आता सरकार मारत आहे, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केली़