शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक कालावधी संपला तरी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही वसतिगृहांवर कब्जा केलेला आहे. त्यामुळे नियमानुसार प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज शुक्रवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पुढाकार घेऊन सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका, वॉर्डन, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली होती; पण या बैठकीस काही विभागप्रमुख व प्राचार्य उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यासाठी अगोदर ८ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी वसतिगृह सोडले नाही, तर मग कुलसचिव, विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिकांसमक्ष पोलिसांच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहाबाहेर काढले जाईल. यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, विभागप्रमुख व विद्यार्थी यांच्यामध्ये पाहिजे तसा सुसंवाद नाही. विभागप्रमुखांनीच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. बेकायदेशीरपणे वसतिगृहे बळकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कृतीस संबंधित विभागप्रमुख हेच जबाबदार आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल संबंधित विभागप्रमुख व त्यांच्या प्राध्यापकांना माहिती असला पाहिजे. तो काय करतो, कुठे राहतो, त्याच्या संशोधनाचा कालावधी किती आहे. तो संपला असेल, तर त्याला कोणता सल्ला दिला, यासंबंधीची इत्थंभूत माहिती प्राध्यापकांना असावी; पण दुर्दैवाने ते होत नाही. यापुढे विभागप्रमुख व प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.