शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

राष्ट्रीय महामार्गावरही प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST

उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक वाहतुकीमुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.शहरातील मध्य भागातून मुंबई-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे, मुंबई, सोलापूर, विजापूर, हैद्राबाद, गुलबर्गा, हुमनाबाद, निजामाबाद, जहिराबाद या विविध भागात दिवसाकाठी हजारो वाहनांची वर्दळ सुरु असजे. या विविध मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मालवाहतूक केली जाते. काही मालवाहतूक करणाऱ्या मालट्रकवर भले मोठे मालाचे उंचच्या उंच ढिगारे लोंबकळत असल्याचे दिसून येते. अशा या धोकादायक मालवाहतुकीमुळे समोरुन येणाऱ्या इतर मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना या धोकादायक वाहतुकीचा सामना करावा लागत असून, प्रसंगी होणाऱ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गासह गुलबर्गा-लातूर, डिग्गी, बेडगा, गुंजोटी-उमरगा, नारंगवाडी-उमरगा या विविध मार्गावरुन बांधकाम साहित्याच्या मिक्सर, सळई, मोठी अवजारे अशी धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बांधकामासाठी टमटममध्ये पत्रे, लोखंडी पाईप वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या धोकादायक वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मालवाहतूक करणारी वाहने नेमकी कोणाची ती कोठून कुठे चाललीत याची कुणाला पर्वा नसते. अशा या वाहनामुळे वाहतूक करणाऱ्या लोखंडी सळया, लोखंडी पाईप, घर बांधकामाचे पत्रे या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर शहर परिसरातील डिग्गी, बेडगा, गुंजोटी, नारंगवाडी, मातोळा, तुरोरी, दाबका, कवठा, मुळज, तलमोड आदीसह मार्गावरील प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. (वार्ताहर)४शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होवून अपघात झाले आहेत. झालेल्या अपघातात अनेकांना आपले बळी द्यावे लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरुन होणाऱ्या मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक नसल्याचे दिसून येत आहे. धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावरही पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही असा प्रश्न प्रवाशी व नागरिकांतून केला जात आहे. शहर व परिसरातील अवैध वाहतूक, नियमबाह्य व धोकादायक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.