शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

राष्ट्रीय महामार्गावरही प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST

उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक वाहतुकीमुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.शहरातील मध्य भागातून मुंबई-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे, मुंबई, सोलापूर, विजापूर, हैद्राबाद, गुलबर्गा, हुमनाबाद, निजामाबाद, जहिराबाद या विविध भागात दिवसाकाठी हजारो वाहनांची वर्दळ सुरु असजे. या विविध मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मालवाहतूक केली जाते. काही मालवाहतूक करणाऱ्या मालट्रकवर भले मोठे मालाचे उंचच्या उंच ढिगारे लोंबकळत असल्याचे दिसून येते. अशा या धोकादायक मालवाहतुकीमुळे समोरुन येणाऱ्या इतर मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना या धोकादायक वाहतुकीचा सामना करावा लागत असून, प्रसंगी होणाऱ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गासह गुलबर्गा-लातूर, डिग्गी, बेडगा, गुंजोटी-उमरगा, नारंगवाडी-उमरगा या विविध मार्गावरुन बांधकाम साहित्याच्या मिक्सर, सळई, मोठी अवजारे अशी धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बांधकामासाठी टमटममध्ये पत्रे, लोखंडी पाईप वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या धोकादायक वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मालवाहतूक करणारी वाहने नेमकी कोणाची ती कोठून कुठे चाललीत याची कुणाला पर्वा नसते. अशा या वाहनामुळे वाहतूक करणाऱ्या लोखंडी सळया, लोखंडी पाईप, घर बांधकामाचे पत्रे या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर शहर परिसरातील डिग्गी, बेडगा, गुंजोटी, नारंगवाडी, मातोळा, तुरोरी, दाबका, कवठा, मुळज, तलमोड आदीसह मार्गावरील प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. (वार्ताहर)४शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होवून अपघात झाले आहेत. झालेल्या अपघातात अनेकांना आपले बळी द्यावे लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरुन होणाऱ्या मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक नसल्याचे दिसून येत आहे. धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावरही पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही असा प्रश्न प्रवाशी व नागरिकांतून केला जात आहे. शहर व परिसरातील अवैध वाहतूक, नियमबाह्य व धोकादायक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.