शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

पालक सचिवांनी दुष्काळी स्थितीचा घेतला आढावा

By admin | Updated: November 18, 2014 01:06 IST

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालक सचिव राजेशकुमार म्हणाले की, नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून घ्याव्यात. नागरिकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. जलस्त्रोताची तपासणी करून नादुरूस्त असलेले हातपंपही दुरूस्त करून घेण्याबरोबरच उपलब्ध असलेला जलसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत विविध शासकीय कार्यालयांमार्फत पाणीपुरवठ्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यावेळी सादर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पदमाकर केंद्रे, डीआरडीचे प्रकल्प संचालक नितीन थाडे आदींची उपस्थिती होती.प्रधान सचिव राजेशकुमार यांनी पीरकल्याण येथील मध्यम प्रकल्पास भेट देऊन उपलब्ध पाण्याची पाहणी केली. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी प्रकल्पातील पाणी उपसा झाल्यानंतर गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येणार असून प्रकल्प क्षेत्रात जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.