शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

पालक सचिवांनी दुष्काळी स्थितीचा घेतला आढावा

By admin | Updated: November 18, 2014 01:06 IST

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत

जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालक सचिव राजेशकुमार म्हणाले की, नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून घ्याव्यात. नागरिकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. जलस्त्रोताची तपासणी करून नादुरूस्त असलेले हातपंपही दुरूस्त करून घेण्याबरोबरच उपलब्ध असलेला जलसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत विविध शासकीय कार्यालयांमार्फत पाणीपुरवठ्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यावेळी सादर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पदमाकर केंद्रे, डीआरडीचे प्रकल्प संचालक नितीन थाडे आदींची उपस्थिती होती.प्रधान सचिव राजेशकुमार यांनी पीरकल्याण येथील मध्यम प्रकल्पास भेट देऊन उपलब्ध पाण्याची पाहणी केली. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी प्रकल्पातील पाणी उपसा झाल्यानंतर गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येणार असून प्रकल्प क्षेत्रात जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.