शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

थकबाकी २१ कोटी; वसुली केवळ १५ %

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

संजय कुलकर्णी , जालना मराठवाड्यात एकेकाळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या जालना नगरपालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून चालू आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी

संजय कुलकर्णी , जालनामराठवाड्यात एकेकाळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या जालना नगरपालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून चालू आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी असताना मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण केवळ १५.४६ टक्के एवढेच आहे. त्यामुळे पालिकेसमोर वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.‘अ’ वर्गाची नगरपालिका असल्याने शहरात पालिकेने पुरेशा नागरी सुविधा द्याव्यात, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. परंतु वसुलीच नसल्याने सुविधा कशा द्यायच्या? असा युक्तीवाद नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नगरपालिकेला मालमत्ता करापोटी २१ कोटी ६८ लाख ८३ हजार रुपये येणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांच्या काळात ३१ जानेवारी २०१५ पर्यंत केवळ ३ कोटी ३५ लाख ३८ हजार रुपयांचीच वसुली झाली. तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात ४५ हजार मालमत्ताधारक आहेत. सध्या पालिकेकडून नवीन मालमत्ताधारकांचा शोध घेण्यासाठी सर्व्हेचे कामही सुरू आहे. वसुलीसाठी सदर बाजार, कादराबाद आणि जुना जालना असे तीन विभाग पालिकेने केलेले आहेत. यामध्ये सहा निरीक्षक आणि ३० वसुली लिपिकांची एकूण सहा पथके आहेत. या पथकांकडून सातत्याने वसुली मोहिम राबविण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वसुली बोटांवर मोजण्याइतक्या मालमत्ता धारकांकडूनच होत आहे. पालिकेकडे मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वसुली पथके जेव्हा जातात, त्यावेळी बहुतांश जणांकडून टाळाटाळ होते, असे या पथकातीलच काही जणांनी सांगितले. लोकांची मानसिकता नाही, असे बोलले जाते. सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची तर कराचा भरणा करावा अशी पालिकेची अपेक्षा आहे. परंतु सुविधा दिल्याच नाहीत, तर वसुलीविना दिल्या नाही, असा दावा करण्यास पालिकेचे अधिकारी तत्पर असतात, असेही चित्र दिसून येते.विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी जानेवारी महिन्यात जालन्याचा दौरा केला. यात त्यांनी नगरपालिकेला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. त्यावेळी वसुलीचे प्रमाण केवळ १५.४६ टक्के असल्याचे ऐकून ते अचंबित झाले. एकेकाळी ‘जालना सोने का पालना’ अशी ओळख असलेल्या या शहराच्या वसुलीचे हे प्रमाण पाहून आयुक्त दांगट यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आयुक्तांच्या या दौऱ्यानंतरही वसुली मोहिमेला जोर आला नाही.याबाबत नगरपालिकेचे मालमत्ता कर विभागाचे अधिकारी के.के. आंधळे म्हणाले, पालिकेच्या वतीने सहा पथकांमार्फत शहरात वसुलीचे काम सुरू आहे. अधिक काळ थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर आम्ही जप्तीची कार्यवाही करत असून दंवडी पिटवून थकबाकी करण्याची मोहीमही आम्ही राबविणार आहोत, असे आंधळे यांनी सांगितले.