शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

तक्रारी करण्यातही उस्मानाबाद पिछाडीवर

By admin | Updated: May 30, 2014 00:25 IST

उस्मानाबाद : चुकीची बिले, खंडीत वीजपुरवठा आदींबाबत ओरड करणार्‍या ग्राहकांनी तक्रारी ऐकून घेण्यासाठी सुरू केलेल्या कॉल सेंटरकडे मात्र कानाडोळा केल्याचे चित्र आहे

 उस्मानाबाद : चुकीची बिले, खंडीत वीज पुरवठा आदींबाबत नेहमीच ओरड करणार्‍या जिल्ह्यातील ग्राहकांनी वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी सुरू केलेल्या कॉल सेंटरकडे मात्र कानाडोळा केल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यात या जिल्ह्यातून केवळ ३६२ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या असून, याउलट लातूर आणि बीड जिल्ह्यातून मात्र सुमारे तीन पट तक्रारी दाखल झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून अंदाजे वीज बिलाची तसेच नादुरूस्त ट्रान्सफार्मर आदींबाबतच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याबाबत लोकप्रतिनिधींनी बोलाविलेल्या बैठकांमधूनही ग्रामस्थांकडून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला जातो. यावरून लोकप्रतिनिधी संबंधित अधिकार्‍यांना धारेवरही धरतात. याचबरोबर स्थानिक कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेतली जातनाही, अशीही ओरड ग्राहकांची होती. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी थेट महावितरणपर्यंत पोहोंचून त्याची तात्काळ सोडवणूक करता यावी, या उद्देशाने वीज वितरण कंपनीने स्थानिक पातळीवरील सर्व फ्युज कॉल सेंटर बंद करून संबंध महाराष्टÑासाठी मुंबई व पुणे येथे कॉल सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून विजेच्या तक्रारी घेतल्या जातात. वीज वितरण कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातून केवळ ३६२ तक्रारी या कॉल सेंटरवरून नोंदविल्या गेल्या आहेत. याउलट बीड जिल्ह्यातून ७३४ तर लातूर जिल्ह्यातून तब्बल ८४८ ग्राहकांनी विविध स्वरूपाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. जिल्ह्यातून नोंदविलेल्या गेलेल्या ३६२ तक्रारींमध्ये मार्च महिन्यात १२१, एप्रिल महिन्यात १०५ तर मे महिन्यात आतापर्यंत १३६ ग्राहकांनी या तक्रारी नोंदविल्या आहेत. दरम्यान, ग्राहकांनी या सुविधेचा फायदा घेऊन आपल्या तक्रारींची सोडवणूक करावी, असे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता पाटील व उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता अरूण पापडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) तीन नंबर नोंदविण्याची सोय वीज कंपनीने सुरू केलेल्या या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक हा १८०० २३३ ३४३५ व १८०० २०० ३४३५ हे क्रमांक असून, ते २४ तास खुले आहेत. ग्राहकाला कुठल्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरून कॉल करता येतो. सुरूवातीला एकदा १२ अंकी वीज ग्राहक क्रमांक नोंदविणे आवश्यक असून, यासाठी ग्राहकाला आपले तीन वेगवेगळे फोन अथवा मोबाईल नंबर नोंदविता येणार आहेत. यानंतर नोंदविलेल्या क्रमांकावरून तक्रार केल्यास पुन्हा ग्राहकाला वीज ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज पडणार नाही.