शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

तेरा समित्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

By admin | Updated: January 28, 2017 00:44 IST

उस्मानाबाद : १३ समित्यांनी वसूलपात्र ३३ लाख रूपये शासनखाती जमा न केल्याने अखेर अध्यक्ष-सचिवांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद : जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेअंतर्गत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. परंतु, काही समित्यांनी अंदाजपत्रकानुसार कामे न करता पैसे लाढल्याचे चौकशीतून उघड झाले होते. त्यानुसार अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेश संबंधित समित्यांना दिले होते. परंतु, १३ समित्यांनी वसूलपात्र ३३ लाख रूपये शासनखाती जमा न केल्याने अखेर अध्यक्ष-सचिवांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन समिती पदाधिकाऱ्यांत एकच खळबळ माजली आहे.ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागू नये, यासाठी भारत निर्माण तसेच जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत एक-दोन नव्हे, तर जिल्ह्यातील तब्बल १९२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. यापैकी काही गावांची पायपीट थांबली. तर काही गावांमध्ये आजही टाक्यांमध्ये पाणी पडले नाही. त्यामुळे अशा गावांतील ग्रामस्थांना पाणी योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च होऊनही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशा योजनांच्या बाबतीत तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने संबंधित योजनांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती सुमारे ४० ते ४२ गावच्या पाणीपुरवठा समित्यांनी अंदाजपत्रकानुसार कामे केली नसल्याचे समोर आले होते. चौकशीअंती संबंधित समित्यांकडील वसूलपात्र (अपहारित) रक्कम निश्चित करण्यात आली होती. वसूलपात्र रक्कम भरण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नोटिसा बजावून रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार २७ समित्याच्या पदाधिकाऱ्यांनी ४८ लाख रूपये शासनखाती जमा करून फौजदारी स्वरूपाच्या कारवाईतून सुटका करून घेतली. दरम्यान, असे असतानाच दुसरीकडे तेरा समित्यांनी प्रशासनाच्या नोटिसेला केराची टोपली दाखविली. वारंवार आदेशित करूनही समित्यांकडून वसूलपात्र सर्व रक्कम शासनखाती जमा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून अशा समित्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित समित्यांचे अध्यक्ष-सचिव यांच्याविरूद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील पाच समित्यांचा समावेश आहे. यापाठोपाठ कळंब तालुक्यातील तीन, तुळजापूर तीन, उमरगा एक आणि परंडा तालुक्यातील एका समितीचा समावेश आहे. या सर्व १३ समित्यांकडे मिळून ३३ लाख ३४ हजार रूपये एवढी वसूलपात्र रक्कम आहे. (प्रतिनिधी)