शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

तेरा समित्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

By admin | Updated: January 28, 2017 00:44 IST

उस्मानाबाद : १३ समित्यांनी वसूलपात्र ३३ लाख रूपये शासनखाती जमा न केल्याने अखेर अध्यक्ष-सचिवांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद : जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेअंतर्गत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली होती. परंतु, काही समित्यांनी अंदाजपत्रकानुसार कामे न करता पैसे लाढल्याचे चौकशीतून उघड झाले होते. त्यानुसार अपहारित रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेश संबंधित समित्यांना दिले होते. परंतु, १३ समित्यांनी वसूलपात्र ३३ लाख रूपये शासनखाती जमा न केल्याने अखेर अध्यक्ष-सचिवांविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन समिती पदाधिकाऱ्यांत एकच खळबळ माजली आहे.ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागू नये, यासाठी भारत निर्माण तसेच जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत एक-दोन नव्हे, तर जिल्ह्यातील तब्बल १९२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. यापैकी काही गावांची पायपीट थांबली. तर काही गावांमध्ये आजही टाक्यांमध्ये पाणी पडले नाही. त्यामुळे अशा गावांतील ग्रामस्थांना पाणी योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च होऊनही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशा योजनांच्या बाबतीत तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने संबंधित योजनांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती सुमारे ४० ते ४२ गावच्या पाणीपुरवठा समित्यांनी अंदाजपत्रकानुसार कामे केली नसल्याचे समोर आले होते. चौकशीअंती संबंधित समित्यांकडील वसूलपात्र (अपहारित) रक्कम निश्चित करण्यात आली होती. वसूलपात्र रक्कम भरण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नोटिसा बजावून रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार २७ समित्याच्या पदाधिकाऱ्यांनी ४८ लाख रूपये शासनखाती जमा करून फौजदारी स्वरूपाच्या कारवाईतून सुटका करून घेतली. दरम्यान, असे असतानाच दुसरीकडे तेरा समित्यांनी प्रशासनाच्या नोटिसेला केराची टोपली दाखविली. वारंवार आदेशित करूनही समित्यांकडून वसूलपात्र सर्व रक्कम शासनखाती जमा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून अशा समित्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित समित्यांचे अध्यक्ष-सचिव यांच्याविरूद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील पाच समित्यांचा समावेश आहे. यापाठोपाठ कळंब तालुक्यातील तीन, तुळजापूर तीन, उमरगा एक आणि परंडा तालुक्यातील एका समितीचा समावेश आहे. या सर्व १३ समित्यांकडे मिळून ३३ लाख ३४ हजार रूपये एवढी वसूलपात्र रक्कम आहे. (प्रतिनिधी)