शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

पात्रातील अतिक्रमणे काढण्यास विरोध

By admin | Updated: May 3, 2016 01:13 IST

औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश नुकतेच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण

औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश नुकतेच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक नदीच्या पात्रात पोहोचले. नागरिकांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. १०० फुटांपर्यंतची अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे मनपाचे पथक परतले.सात-आठ वर्षांपूर्वी मनपाने तालुका भूमी अभिलेख विभागाकडून खाम नदीचे पात्र मोजून काढले होते. तालुका भूमी अभिलेख विभागाने नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंटचे पोल लावले आहेत. या मार्किंगनुसार आजही शेकडो घरे त्यात येतात. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नदीच्या पात्रात मोठी कारवाई केली होती. मागील आठवड्यात मनपा आयुक्त बकोरिया यांनी नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देण्यासाठी कारवाई करावी, असा आदेश दिला. त्यानुसार सोमवारी उपायुक्त रवींद्र निकम, प्रभारी नगररचना सहसंचालक वसंत निकम आदी अधिकारी नदीपात्रात पोहोचले. जटवाडा भागात अगोदरच पाचशेहून अधिक नागरिक जमलेले होते. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला पाहून नागरिक अधिकच संतप्त झाले. या भागातील नगरसेवक रूपचंद वाघमारे यांनी नागरिकांची समजूत घातली. १०० फुटांपर्यंत कारवाईला आमचा कोणताही विरोध नाही. जहांगीर कॉलनी आदी भागात काही पत्र्याचे शेड लावलेली अतिक्रमणे आहेत. ती आम्ही स्वत:हून काढून घेण्यास तयार आहोत. नदीपात्राची मोजणी मनपाच्या नगररचना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. मोजणी करून मनपाचे अतिक्रमण हटाव पथक परत फिरले.खाम नदीपात्रातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून द्यावा, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. सोमवारी आम्ही कारवाईसाठी जटवाडा भागात गेलो होतो. नागरिकांनी १०० फुटांपेक्षा अधिक कारवाई करू नये, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे नदीपात्राला कायमस्वरूपी भिंत बांधून द्यावी, अशी विनंती केली. पात्र किती फूट ठेवायचे, कारवाई किती जणांवर करायची यासंदर्भात प्रशासनाने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. -रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा