शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत समारंभात होणार केवळ नावांचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभात २५ जून रोजी मेअखेरपर्यंत पीएच.डी. मिळालेल्या ४८४ संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण होणार ...

औरंगाबाद : विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षांत समारंभात २५ जून रोजी मेअखेरपर्यंत पीएच.डी. मिळालेल्या ४८४ संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण होणार नाही. त्यादिवशी फक्त त्यांच्या नावांचे वाचन होईल. हा समारंभ यंदा ऑनलाईन पद्धतीने होणार असला तरी, तो अविस्मरणीय व्हावा, यासाठी आपण सर्वजण सामूहिक प्रयत्न करू, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ येत्या २५ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कुलगुरूंनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन, डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, यंदा राज्यातील सर्वच विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती भगतसिंग कोश्यारी असतील. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

चौकट......

समारंभाच्या नियोजनासाठी १२ समित्यांची स्थापना

सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत सदर कार्यक्रम होईल. यावेळी पीएच.डी. संशोधकांना प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण न करता फक्त त्यांच्या नावाचे वाचन होईल. ३१ मेपर्यंत ४८४ संशोधकांनी पीएच.डी. पदवी मिळविली असून, यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे - २१६, विज्ञान व तंत्रज्ञान - १६५, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र - ५८ व आंतरविद्या शाखेच्या ४५ संशोधकांचा समावेश आहे. राजभवनच्या प्रोटोकॉलनुसार सदर सोहळा अत्यंत शिस्तबध्द व प्रोफेशनल पद्धतीने होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध १२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.