शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

क्रिकेटची अविरत सेवा हाच ध्यास...

By admin | Updated: November 16, 2015 00:38 IST

महेश पाळणे , लातूर भारतात लोकप्रिय असलेला क्रिकेट चाहत्यांचा लाडका खेळ आहे़ या खेळाची सेवा अनेक माध्यमातून माझ्या हातून होते, याचा सर्वस्वी आनंद आहे़

महेश पाळणे , लातूरभारतात लोकप्रिय असलेला क्रिकेट चाहत्यांचा लाडका खेळ आहे़ या खेळाची सेवा अनेक माध्यमातून माझ्या हातून होते, याचा सर्वस्वी आनंद आहे़ या क्रिकेटची अविरत सेवा हाच माझा ध्यास असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे निरीक्षक तथा विभागीय सचिव कमलेश ठक्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ तीन वेळेस आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्याचे निरीक्षक राहिलेले कमलेश ठक्कर यांनी रविवारी ‘लोकमत’शी आपला सामना निरीक्षकाचा अनुभव व्यक्त केला़ यावेळी ते म्हणाले, सामना निरीक्षक म्हणून लातूरसारख्या शहरातून आपल्यासारख्या संघटकाला संधी मिळते, ही लातूरसाठी गौरवाची बाब आहे़ सामना यशस्वी करण्याची सर्वस्वी जबाबदारी निरीक्षकाची असते़ त्यामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक असते़ त्या दिवशीचा तो सामना यशस्वी करण्याची धडपड माझी असते़ विशेषत: सुरक्षेच्या गोष्टीवर अधिक भर दिला जातो़ पंच, प्रसार माध्यम, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी यासह खेळाडू व प्रशिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असते़ बीसीसीआयने दिलेल्या गाईड लाईनचे तंतोतंत पालन होते का नाही, हेही पाहणे यावेळी गरजेचे असते़ वैद्यकीय सेवा तसेच खेळाडू व प्रेक्षकांच्या संबंधित व्यवस्था सुरळीत आहे का हेही यावेळी पहावे लागते़ स्पर्धेदरम्यान दिवसभर मैदानावरील घडामोडींवर प्रत्येक वेळी लक्ष देणे बंधनकारक असते़ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के व बीसीसीआयने माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा आदर करतो़ भविष्यातही क्रिकेटच्या बाबतीत कसल्याही प्रकारची सेवा करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़मी निरीक्षक असलेल्या पहिल्या सामन्यात ग्वाल्हेर येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविला होता़ या सामन्यात सचिन तेंडूलकरने २०० धावा केल्या होत्या़ इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने वेस्टइंडिजचा पराभव केला होता़ यातही विरेंद्र सेहवागने २१९ धावा ठोकल्या होत्या़ नुकत्याच झालेल्या व माझ्या तिसऱ्या निरीक्षक पदाच्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून निसटता पराभव स्विकारावा लागला़ याही सामन्यात रोहित शर्माने १५० धावा केल्या होत्या़ रोहित शर्मा या सामन्यात २०० धावा करु शकला असता व भारत मॅच जिंकला असता, तर तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंचे द्विशतक व भारताचा विजय हे हॅट्ट्रीकचे समिकरण झाले असते़ मी निरीक्षक असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारत हरल्याने दु:ख वाटले़ यासह जबाबदारीमुळे सामना पाहण्याचा आनंद मात्र निरीक्षक असल्याने घेता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले़