शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

जिल्ह्यात अवघे ५७६० हेक्टर वनक्षेत्र

By admin | Updated: March 26, 2017 23:12 IST

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाही. आजही जिल्ह्यात केवळ ५७६० हेक्टर क्षेत्र वनाने व्यापलेले आहे. हे प्रमाण ०.८५ टक्के इतके आहे. जे राज्याच्या बराबरीने म्हणजेच किमान १६ ते २० टक्यांदरम्यान असणे अपेक्षित आहे.राष्ट्रीय व राज्य धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात राज्यात २० टक्के वनक्षेत्र आहे. तर जिल्ह्यात अवघे ०.८२ टक्के इतके अत्यल्प क्षेत्र वनाखाली आहे. दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी शासनामार्फत वन विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा त्याचाच एक भाग. गत पावसाळ्यात विविध शासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु, अनेक संस्था, कार्यालयाकडून वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी लागवड केलेल्या ठिकाणी रोपांऐवजी केवळ खड्डे उरल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. हे थोडके म्हणून की काय, आजही विशेषत: डोंगरी भागातील वनक्षेत्रांतर्गतच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते. यासह आदी बाबींमुळे जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसून येत नाही. सर्वाधिक विदारक स्थिती लोहारा तालुक्यात पहावयास मिळते. राखीव वनक्षेत्र केवळ १४७.९२ हेक्टर इतके अत्यल्प आहे. यापैकी अवघे ३८ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. एकूण वनाचा विचार केला असता, १८५.९२ हेक्टर क्षेत्र वृक्षांनी अच्छादित आहे. दरम्यान, परंडा तालुक्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. केवळ २५३.७७ हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे. यापैकी ११२.९५ हेक्टर क्षेत्रावर राखीव वन आहे. तर १३८.८२ टक्के संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र केवळ २ टक्के इतके अत्यल्प आहे. मोठा तालुका म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. परंतु, वनक्षेत्राचा विचार करता, हा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे. ८९६.७३ हेक्टर वनक्षेत्र आहे. यातील ६१२.७३ हेक्टर राखीव वनक्षेत्र तर २०३ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातही समाधानकारक स्थिती नाही. ६१६ हेक्टर क्षेत्र वनाखाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातील ५५० हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. तर केवळ ६५ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र १ हेक्टर एवढे आहे. वाशी तालुक्याची अवस्थाही काही वेगळी नाही. ४४६ हेक्टर वनक्षेत्र आहे. ४२६ राखीव वनक्षेत्र असून २० हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. वाशी पेक्षाही कळंब तालुक्यात विदारक स्थिती आहे. अवघ्या ३७३ हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र असून यापैकी १०२ हेक्टर राखीव वनक्षेत्र असून १९ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. तर दुसरीकडे २५२ हेक्टर क्षेत्र हे वर्गीकृत वन म्हणून ओळखले जाते. उमरगा तालुक्यामध्येही वृक्ष लागवडीवर अधिकाअधिक भर देण्याची गरज आहे. तालुक्यात ५५८ हेक्टर वनक्षेत्र आहे. यापैकी ३४५ हेक्टर क्षेत्र हे राखीव वन म्हणून ओळखले जाते. तर ९० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित वन आहे. आणि १२३ हेक्टर वनक्षेत्र अवर्गीकृत आहे.