शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जिल्ह्यात अवघे ५७६० हेक्टर वनक्षेत्र

By admin | Updated: March 26, 2017 23:12 IST

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाही. आजही जिल्ह्यात केवळ ५७६० हेक्टर क्षेत्र वनाने व्यापलेले आहे. हे प्रमाण ०.८५ टक्के इतके आहे. जे राज्याच्या बराबरीने म्हणजेच किमान १६ ते २० टक्यांदरम्यान असणे अपेक्षित आहे.राष्ट्रीय व राज्य धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात राज्यात २० टक्के वनक्षेत्र आहे. तर जिल्ह्यात अवघे ०.८२ टक्के इतके अत्यल्प क्षेत्र वनाखाली आहे. दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी शासनामार्फत वन विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा त्याचाच एक भाग. गत पावसाळ्यात विविध शासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु, अनेक संस्था, कार्यालयाकडून वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी लागवड केलेल्या ठिकाणी रोपांऐवजी केवळ खड्डे उरल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. हे थोडके म्हणून की काय, आजही विशेषत: डोंगरी भागातील वनक्षेत्रांतर्गतच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते. यासह आदी बाबींमुळे जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसून येत नाही. सर्वाधिक विदारक स्थिती लोहारा तालुक्यात पहावयास मिळते. राखीव वनक्षेत्र केवळ १४७.९२ हेक्टर इतके अत्यल्प आहे. यापैकी अवघे ३८ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. एकूण वनाचा विचार केला असता, १८५.९२ हेक्टर क्षेत्र वृक्षांनी अच्छादित आहे. दरम्यान, परंडा तालुक्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. केवळ २५३.७७ हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे. यापैकी ११२.९५ हेक्टर क्षेत्रावर राखीव वन आहे. तर १३८.८२ टक्के संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र केवळ २ टक्के इतके अत्यल्प आहे. मोठा तालुका म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. परंतु, वनक्षेत्राचा विचार करता, हा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे. ८९६.७३ हेक्टर वनक्षेत्र आहे. यातील ६१२.७३ हेक्टर राखीव वनक्षेत्र तर २०३ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातही समाधानकारक स्थिती नाही. ६१६ हेक्टर क्षेत्र वनाखाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातील ५५० हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. तर केवळ ६५ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र १ हेक्टर एवढे आहे. वाशी तालुक्याची अवस्थाही काही वेगळी नाही. ४४६ हेक्टर वनक्षेत्र आहे. ४२६ राखीव वनक्षेत्र असून २० हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. वाशी पेक्षाही कळंब तालुक्यात विदारक स्थिती आहे. अवघ्या ३७३ हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र असून यापैकी १०२ हेक्टर राखीव वनक्षेत्र असून १९ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. तर दुसरीकडे २५२ हेक्टर क्षेत्र हे वर्गीकृत वन म्हणून ओळखले जाते. उमरगा तालुक्यामध्येही वृक्ष लागवडीवर अधिकाअधिक भर देण्याची गरज आहे. तालुक्यात ५५८ हेक्टर वनक्षेत्र आहे. यापैकी ३४५ हेक्टर क्षेत्र हे राखीव वन म्हणून ओळखले जाते. तर ९० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित वन आहे. आणि १२३ हेक्टर वनक्षेत्र अवर्गीकृत आहे.