शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

१०७ गावांना केवळ ५ पर्जन्यमापक यंत्रे

By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST

मांडवा : परळी तालुक्यातील १०७ गावांच्या पर्जन्याची नोंद केवळ पाच मंडळांवर केली जात आहे. ही नोंद संपूर्ण मंडळाची नोंद समजली जाते.

मांडवा : परळी तालुक्यातील १०७ गावांच्या पर्जन्याची नोंद केवळ पाच मंडळांवर केली जात आहे. ही नोंद संपूर्ण मंडळाची नोंद समजली जाते. यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास व योग्य पर्जन्यमाप मिळत नसल्याने शेतातील पिकांच्या नियोजनास मोठा अडथळा निर्माण होत आहे. परळी तालुक्यातील १०७ गावांचा समावेश होतो. त्यासाठी पाच महसूल मंडळे आहेत. या पाच महसूल मंडळात १०७ गावांची विभागणी करण्यात आलेली आहे. परळी तालुक्यात कधी गारपीट तर कधी निसर्गाच्या लहरीपणाला येथील लोकांना सामोरे जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत नाही. काही गावात पाऊस पडतो तर काही गावांमध्ये पाऊस हुलकावणी देत असल्याचेही समोर आले आहे. मंडळाच्या एखाद्या गावात कमी- जास्त पाऊस झाला . तसेच एखाद्या गावात पाऊस झालाच नाही तरी पण त्या मंडळाची आलेली पावसाची सरासरी त्या गावांसाठी गृहित धरली जात आहे . एखाद्या गावात कमी पाऊस असला तरी त्याची नोंद ज्या गावात पाऊस झाला आहे त्याच्यासोबत केली जात आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजना व पीक विम्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. तालुक्यातील शेतकरीवर्गातून वारंवार गावनिहाय व तलाठी सज्जावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. एका महिन्याच्या आत तलाठी सज्जावर पर्जन्यमापक यंत्रे न बसविल्यावर महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.(वार्ताहर)