शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

कांद्याची फोडणी महागली

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र अर्थिक झळ सोसावी लागत आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा येतो. पावसाळ््यास प्रारंभ होऊनही अद्याप पाऊस आलाच नसल्याने याचा परिणाम आठवडी बाजारावरही जाणवू लागला आहे. कांदा काढणीच्यावेळी बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत होता. यामुळे प्रतिक्विंटल दर ५० ते ६०० रुपयावर आले होते. मात्र आजघडीला आवकच कमी झाल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.शेतकरी त्यांच्याकडील कांदा काढणी केल्यानंतर तेव्हांच विक्री करुन मोकळा झाला. मात्र आज बाजारात येणारा सर्व कांदा व्यापाऱ्यांनी साठेबाजी करुन ठेवलेलाच आहे. यामुळे या भाववाढीचा शेतकऱ्यांना तीळमात्र फायदा होणार नसून व्यापारीच मालामाल होणार आहेत.मे महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ४ रुपयापासून ८ रुपयापर्यंत होते. मात्र आवक घडल्यामुळे कांद्याचे दर २५ ते ३० रुपयावर जाऊन ठेपले आहेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकऱ्यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागतो. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणुक करण्यासाठी अधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो.दरम्यान, कांद्यासह इतर भाजेपाल्या, पेट्रोल, डिझेलचे भावही सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य अगदी मेटाकुटीला आले आहेत़ त्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजाही संकटात सापडला आहे़ (प्रतिनिधी)