शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

दीड लाख रोपे करपली!

By admin | Updated: June 22, 2014 00:07 IST

अरूण देशमुख, भूम बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने शतकोटी वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेतला.

अरूण देशमुख, भूमबेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने शतकोटी वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेतला. मात्र जिल्ह्यापुरता विचार करता या उपक्रमाचा निव्वळ फज्जा उडाला आहे. गतवर्षी तब्बल १ लाख ६४ हजार रोपांची लागवड केली होती. मात्र वर्षाअखेर केवळ १० टक्के म्हणजेच १६ हजार रोपे जगली, असे प्रशासनाच्या दफ्तरी नमूद आहे. त्यामुळे तब्बल दीड लाख रोपे करपली आहेत.शतकोटी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायती, शाळा, शासकीय जागा आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली जात आहे. वृक्षलागवडीसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खड्डे खोदले जातात. तसेच मागील दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायती अंतर्गत रोपवाटिका तयार करुन संबंधित ग्रामपंचायतींना रोपे वितरित करण्यात आली. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. जि.प.च्या रोहयो कक्षाने प्रत्येक पंचायत समितीला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार भूम पंचायत समितीसाठी २ लाख रोपे लागवडीचे उद्दीष्ट मिळाले होते. मात्र या पंचायत समितीने १ लाख ६४ हजार रोपांचीच लागवड केली.दरम्यान, ही रोपे जगविण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न होणे गरजेचे होते तसे झाले नसल्याचे जगलेल्या रोपांच्या आकडेवारीवरुन समोर येते. १ लाख ६४ हजार रोपांची लागवड केली असता, त्यापैकी केवळ १० टक्के रोपे जगली असे खुद्द पंचायत समिती प्रशासनाकडून सांगितले जात आहे. याचाच अर्थ केवळ १६ हजार रोपे जगविण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित १ लाख ४८ हजार रोपे करपून गेली. त्यामुळे खड्डे खोदण्यापासून ते रोपांची जोपासनी करण्यापर्यंत झालेला लाखोंचा खर्चही खड्ड्यात गेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाचे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणात जगतील, अशी अपेक्षा होती. मात्र समोर असलेले हे चिंताजनक चित्र कुठेतरी संशोधन करण्यास भाग पाडणारे आहे. लाखोंचा खर्च गेला खड्डयातवृक्ष लागवड केल्यानंतर ते जगतात की नाही, हे पाहण्याची तसदी न घेणाऱ्या भूम पंचायत समितीला पुन्हा ८३ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८३ हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत असा दावा पंचायत समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या रोपांची लागवड झाल्यानंतर यावेळी तरी जास्तीत जास्त रोपे जगविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ‘पहिले पाढं पंचावन्न’ या म्हणीचा प्रयत्न पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.