शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

पुरातन जलस्त्रोत पालिकेकडून दुर्लक्षित

By admin | Updated: March 31, 2016 00:26 IST

अजीत चंदनशिवे , तुळजापूर तीर्थक्षेत्र तुळजापूरला लाभलेला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मोठा आहे़ या शहरातील शिवकालीन, निजामकालीन विहिरी, जलकुंडांमुळे एकेकाळी अवघ्या शहरासह

अजीत चंदनशिवे , तुळजापूरतीर्थक्षेत्र तुळजापूरला लाभलेला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मोठा आहे़ या शहरातील शिवकालीन, निजामकालीन विहिरी, जलकुंडांमुळे एकेकाळी अवघ्या शहरासह भाविकांची तहान भागत होती़ मात्र, त्यानंतरच्या काळात या जलस्त्रोतांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत गेल्याने या जलस्त्रोतांची मोठी दूरवस्था झाली आहे़ पालिका प्रशासनाने तीन वर्षापूर्वी या जलस्त्रोतांची लाखो रूपये खर्च करून दुरूस्ती केली होती़ मात्र, याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा या ऐतिहासिक जलस्त्रोतांची अवस्था बिकट झाली आहे़तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील कमानवेस भागात तीन विहिरीत आहेत़ यात अहिल्याबाई होळकर ही विहीर त्या काळी भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली होती़ तसेच भगवती विहीर ही शहरातील नागरिकांची, भाविकांची तहान भागवित होती़ सध्या या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे़ तर अहिल्याबाई होळकर ही पुरातण विहीर कुलूपबंद ठेवण्यात आली आहे़ शहरातील साळुंखे गल्लीतील कोठाची विहीर ही गोड पाण्याची विहीर म्हणून सर्वत्र परिचित आहे़ निजामकाळात या विहिरीतील पाणी संपूर्ण शहरातील नागरिक वापरत होते़ या विहिरत परिसरातील नागरिकांनीच कचरा टाकल्याने ही विहीरही भरली आहे़ शुक्रवारपेठ मधील सोंजीबाच्या विहिरीची अवस्थाही अशीच झाली आहे़ सोंजीबाच्या विहिरीभोवताली काटेरी झुडपांनी विळखा घातला असून, या विहिरीत सध्या मुबलक पाणी आहे़ मंकावती गल्लीतील मंकावती विहीर ही बाहेरगावातून येणारे भाविक अंघोळीसाठी पाणी मिळावे म्हणून बांधण्यात आली होती़ या विहिरीचीही दूरवस्था झाली असून, या भागातील नागरिक येथे कचरा टाकत आहेत़ शहरातील सूर्यकुंड, चंद्रकुंड, रामकुंड हे डोंगराळ भागात असतानाही इथे पाणी उपलब्ध आहे़ मात्र, आत घाण पडल्याने या पाण्याचा वापर होताना दिसत नाही़ शिवाय घाटशीळ पायथ्याशी असलेला रामकुंडात मुबलक प्रमाणात पाणी आहे़ परंतू कुंडासोभोवताली मोठ-मोठी झाडे-झुडपे उगवली आहेत़ झाडांचा पाला-पाचोळा या कुंडात पडल्याने पाणी खराब झाले आहे़ हे कुंड निजामकाळात घाटशीळ मार्गे चालत येणाऱ्या भाविकांसाठी मोठा लाभदायी ठरत होते एकेकाळी शहरवासियांसह भाविकांची तहान भागविण्यात महत्त्वाचे ठरलेले शहरातील कोटाची विहीर, पिराची विहीर, सोंजीबाची विहीर, भगवती विहीर, अहिल्याबाई होळकर विहीर, लिंगाप्पा विहीर, मंकावती विहीर, गारीबनाथ विहीर, चंद्रकुंड, रामकुंडासह सूर्यकुंडाची मोठी दूरवस्था झाली आहे़ यात कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती पाहता पालिका प्रशासनाने या जलस्त्रोतांचे पूर्नरूजीवन करून त्याचे पुर्नभरण करणे आवश्यक आहे़ या सर्व पुरातन विहिरी, कुंडांचे पुर्नभरण झाले तर शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असून, केवळ दुरूस्ती करणे नव्हे तर याच्या देखभालीसाठीही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़